शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

खासगी बसमुळे अपघाताचा धोका

By admin | Updated: March 21, 2015 00:15 IST

सोलपूर रस्त्यावरील गाडीतळ ते रविदर्शनदरम्यान सायंकाळी साडेसातनंतर खासगी बस रस्त्यात थांबल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

हडपसर : सोलपूर रस्त्यावरील गाडीतळ ते रविदर्शनदरम्यान सायंकाळी साडेसातनंतर खासगी बस रस्त्यात थांबल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि रस्त्यात थांबणाऱ्या बस, कॅब आणि टेम्पोंवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने उड्डाणपुलावरून आणि उड्डाणपुलाच्या खालून वाहने वेगात येत असतात. मात्र, उड्डाणपूल संपताच खासगी ट्रॅव्हल्सच्या बस थांबत असल्यामुळे वाहतूककोंडीमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असूनही या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. वाहनांच्या गर्दीमुळे हकनाक एखाद्याचा बळी जाण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी रात्री दहाच्या सुमारास ट्रॅव्हल बस आणि ट्रकमध्ये सापडून जुन्या पोस्ट आॅफिससमोर एकाला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर काही दिवस परिस्थिती सुधारल्याचे चित्र होते; मात्र पुन्हा जुने पोस्ट आॅफिस ते आकाशवाणीदरम्यान प्रवासी मिळविण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सच्या बस रस्त्यात थांबलेल्या असतात. ट्रक, टेम्पो आणि इतर वाहनांवर वाहतूक पोलीस कारवाई करताना दिसतात; मात्र या ट्रॅव्हल्सवर कारवाई का करीत नाहीत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)टेम्पो आणि कॅबही राहतात उभ्या४रविदर्शनसमोर एसटी महामंडळाने थांबा केलेला असला, तरी तेथेही खासगी ट्रॅव्हल्सच्या बसबरोबर टेम्पो आणि कॅबही रात्री उशिरापर्यंत प्रवासी मिळविण्यासाठी थांबलेल्या असतात. हा प्रकार सर्रास सुरू असला, तरी त्याकडे हडपसर पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलीसही का दुर्लक्ष करतात, याचे उत्तर गुलदस्तात आहे. ४एसटी महामंडळाच्या थांब्यावर खासगी ट्रॅव्हल्सच्या बसना परवानगी कशी देतात? एसटी महामंडळाकडून त्यांच्यावर का कारवाई केली जात नाही? एसटी महामंडळाच्या बसचा थांबा सोडून बस दुसरीकडेच थांबतात; त्यामुळे प्रवासी बुचकळ्यात पडत आहेत. ४एसटी बस चुकल्यामुळे नाइलाजाने महागड्या खासगी ट्रॅव्हल बसचा नागरिकांना आधार घ्यावा लागत आहे. बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांची खासगी ट्रॅव्हल्सकडून लूट होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी बसथांब्याचे नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.