शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

संपूर्ण महाराष्ट्रात येत्या दोन वर्षात गट शेतीचा कार्यक्रम राबविणार - आमिर खान

By निलेश राऊत | Updated: February 29, 2024 19:30 IST

जगात काही अशक्य नाही हे जल संधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील गावांनी याकाळात दाखवून दिले

पुणे : कोविड आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या विचाराने पानी फाऊंडेशन गट शेतीची सुरूवात केली व त्याला शेतकऱ्यांनी उस्त्फूर्त प्रतिसाद दिला. आता काही तालुक्यांपर्यंत मर्यादित असलेले हे गट शेतीचे काम येत्या दोन वर्षात संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याचे पानी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांनी सांगितले.

पानी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२३’ पुरस्कार वितरण सोहळा गुरूवारी संपन्न झाला. त्यावेळी खान बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून, सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे उपस्थित होते. पानी फाउंडेशनच्या संस्थापिका किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ उपस्थित होते.

खान म्हणाले, पानी फाऊंडेशनची सुरूवात २०१६ मध्ये झाली. तेव्हा प्रारंभी चार वर्षे आम्ही जल संधारणावर काम केले. तीन तालुक्यांपासून सुरू झालेले हे काम चार वर्षात ७५ तालुक्यांपर्यंत पोहचले. जगात काही अशक्य नाही हे जल संधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील गावांनी याकाळात दाखवून दिले. आता संपूर्ण महाराष्ट्रात जाण्याचे लक्ष्य फाउंडेशनने बाळगले असून, या माध्यमातून शेकडो शेतकरी - उद्योजक घडवायचे असल्याचे ते म्हणाले.

विलास शिंदे यांनी, गट शेतीचा प्रयोग यशस्वी करणे हे केवळ एकीच्या माध्यमातून शक्य असल्याचे सांगितले. शेतकरी हा अन्नदाता, बळीराजा आहे तसेच तो व्यावसायिक आहे. आता आपली स्पर्धा ही जागतिक पातळीवर असून, गट शेतीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा जिंकू शकतो असेही ते म्हणाले.राज्यातील १८ जिल्ह्यांतील ३९ तालुक्यांमधील ३००० गटांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यात सोलापूर येथील कुंभारगाव ऍग्रो प्रोड्यूसर कंपनी यांना प्रथम पुरस्कार देण्यात आला. जितेंद्र जोशी आणि स्पृहा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास अभिनेते जॅकी श्रॉफ, प्रकाश राज, अतुल कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, आदिनाथ कोठारे, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते.

महिलांचा सहभाग आनंददायक : देवेंद्र फडणवीस

पुरस्कार वितरण सोहळण्यास उपस्थित राहू न शकलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेश पाठवून फार्मर कपला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. फार्मर कापच्या निमित्ताने सरकारी योजनांना चळवळीचे रूप आले आहे. फार्मर कपमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय आहे याचा मला आनंद आहे. या महिलांसाठी फाउंडेशनने विशेष पुरस्कार ठेवले आहेत ही कौतुकाची बाब आहे.

टॅग्स :PuneपुणेAamir Khanआमिर खानFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रSocialसामाजिकenvironmentपर्यावरण