शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

संपूर्ण महाराष्ट्रात येत्या दोन वर्षात गट शेतीचा कार्यक्रम राबविणार - आमिर खान

By निलेश राऊत | Updated: February 29, 2024 19:30 IST

जगात काही अशक्य नाही हे जल संधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील गावांनी याकाळात दाखवून दिले

पुणे : कोविड आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या विचाराने पानी फाऊंडेशन गट शेतीची सुरूवात केली व त्याला शेतकऱ्यांनी उस्त्फूर्त प्रतिसाद दिला. आता काही तालुक्यांपर्यंत मर्यादित असलेले हे गट शेतीचे काम येत्या दोन वर्षात संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याचे पानी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांनी सांगितले.

पानी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२३’ पुरस्कार वितरण सोहळा गुरूवारी संपन्न झाला. त्यावेळी खान बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून, सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे उपस्थित होते. पानी फाउंडेशनच्या संस्थापिका किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ उपस्थित होते.

खान म्हणाले, पानी फाऊंडेशनची सुरूवात २०१६ मध्ये झाली. तेव्हा प्रारंभी चार वर्षे आम्ही जल संधारणावर काम केले. तीन तालुक्यांपासून सुरू झालेले हे काम चार वर्षात ७५ तालुक्यांपर्यंत पोहचले. जगात काही अशक्य नाही हे जल संधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील गावांनी याकाळात दाखवून दिले. आता संपूर्ण महाराष्ट्रात जाण्याचे लक्ष्य फाउंडेशनने बाळगले असून, या माध्यमातून शेकडो शेतकरी - उद्योजक घडवायचे असल्याचे ते म्हणाले.

विलास शिंदे यांनी, गट शेतीचा प्रयोग यशस्वी करणे हे केवळ एकीच्या माध्यमातून शक्य असल्याचे सांगितले. शेतकरी हा अन्नदाता, बळीराजा आहे तसेच तो व्यावसायिक आहे. आता आपली स्पर्धा ही जागतिक पातळीवर असून, गट शेतीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा जिंकू शकतो असेही ते म्हणाले.राज्यातील १८ जिल्ह्यांतील ३९ तालुक्यांमधील ३००० गटांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यात सोलापूर येथील कुंभारगाव ऍग्रो प्रोड्यूसर कंपनी यांना प्रथम पुरस्कार देण्यात आला. जितेंद्र जोशी आणि स्पृहा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास अभिनेते जॅकी श्रॉफ, प्रकाश राज, अतुल कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, आदिनाथ कोठारे, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते.

महिलांचा सहभाग आनंददायक : देवेंद्र फडणवीस

पुरस्कार वितरण सोहळण्यास उपस्थित राहू न शकलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेश पाठवून फार्मर कपला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. फार्मर कापच्या निमित्ताने सरकारी योजनांना चळवळीचे रूप आले आहे. फार्मर कपमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय आहे याचा मला आनंद आहे. या महिलांसाठी फाउंडेशनने विशेष पुरस्कार ठेवले आहेत ही कौतुकाची बाब आहे.

टॅग्स :PuneपुणेAamir Khanआमिर खानFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रSocialसामाजिकenvironmentपर्यावरण