शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

संपूर्ण महाराष्ट्रात येत्या दोन वर्षात गट शेतीचा कार्यक्रम राबविणार - आमिर खान

By निलेश राऊत | Updated: February 29, 2024 19:30 IST

जगात काही अशक्य नाही हे जल संधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील गावांनी याकाळात दाखवून दिले

पुणे : कोविड आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या विचाराने पानी फाऊंडेशन गट शेतीची सुरूवात केली व त्याला शेतकऱ्यांनी उस्त्फूर्त प्रतिसाद दिला. आता काही तालुक्यांपर्यंत मर्यादित असलेले हे गट शेतीचे काम येत्या दोन वर्षात संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याचे पानी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांनी सांगितले.

पानी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२३’ पुरस्कार वितरण सोहळा गुरूवारी संपन्न झाला. त्यावेळी खान बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून, सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे उपस्थित होते. पानी फाउंडेशनच्या संस्थापिका किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ उपस्थित होते.

खान म्हणाले, पानी फाऊंडेशनची सुरूवात २०१६ मध्ये झाली. तेव्हा प्रारंभी चार वर्षे आम्ही जल संधारणावर काम केले. तीन तालुक्यांपासून सुरू झालेले हे काम चार वर्षात ७५ तालुक्यांपर्यंत पोहचले. जगात काही अशक्य नाही हे जल संधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील गावांनी याकाळात दाखवून दिले. आता संपूर्ण महाराष्ट्रात जाण्याचे लक्ष्य फाउंडेशनने बाळगले असून, या माध्यमातून शेकडो शेतकरी - उद्योजक घडवायचे असल्याचे ते म्हणाले.

विलास शिंदे यांनी, गट शेतीचा प्रयोग यशस्वी करणे हे केवळ एकीच्या माध्यमातून शक्य असल्याचे सांगितले. शेतकरी हा अन्नदाता, बळीराजा आहे तसेच तो व्यावसायिक आहे. आता आपली स्पर्धा ही जागतिक पातळीवर असून, गट शेतीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा जिंकू शकतो असेही ते म्हणाले.राज्यातील १८ जिल्ह्यांतील ३९ तालुक्यांमधील ३००० गटांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यात सोलापूर येथील कुंभारगाव ऍग्रो प्रोड्यूसर कंपनी यांना प्रथम पुरस्कार देण्यात आला. जितेंद्र जोशी आणि स्पृहा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास अभिनेते जॅकी श्रॉफ, प्रकाश राज, अतुल कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, आदिनाथ कोठारे, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते.

महिलांचा सहभाग आनंददायक : देवेंद्र फडणवीस

पुरस्कार वितरण सोहळण्यास उपस्थित राहू न शकलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेश पाठवून फार्मर कपला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. फार्मर कापच्या निमित्ताने सरकारी योजनांना चळवळीचे रूप आले आहे. फार्मर कपमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय आहे याचा मला आनंद आहे. या महिलांसाठी फाउंडेशनने विशेष पुरस्कार ठेवले आहेत ही कौतुकाची बाब आहे.

टॅग्स :PuneपुणेAamir Khanआमिर खानFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रSocialसामाजिकenvironmentपर्यावरण