शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

पुणे जिल्ह्यातील ६५ हजार नागरिकांना मिळणार शरद भोजन योजने अंतर्गत अन्नधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 4:16 PM

जिल्ह्यातील २४ हजार ३७२ कुटुबांमधील ६५ हजार ७९९ नागरिकांना गहू आणि तांदुळ वाटप करण्यात येणार

ठळक मुद्देयोजनेचा तिसरा टप्पा : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून होणार वाटपखेड तालुक्यात सर्वाधिक ४ हजार २३८ कुटुंब लाभार्थी लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही आणि योजनेचा गैरवापर होणार नाही याबाबत सूचना अडीच किलो गहू आणि अडीच किलो तांदुळ असणार

पुणे : संचाबंदीमुळे वृद्ध, दिव्यांग आणि गरोदर मातांना दोनवेळचे जेवण मिळण्यासाठी कागदपत्रे नसणा-यांना देखील अन्नधान्य वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. जिल्ह्यातील असे गरजु लाभार्भी निश्चित करण्यात आले असून शरद भोजन योजने अंतर्गत जिल्ह्यातील २४ हजार ३७२ कुटुबांमधील ६५ हजार ७९९ नागरिकांना गहू आणि तांदुळ वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.देशात आणि राज्यात लॉकडाऊन जाहिर झाले. यामुळे अनेक कामगार राज्यात अडकुन पडले. काम बंद  पडल्याने तसेच जवळ पैसे नसल्याने त्यांच्या कुटुंबियांची गैरसोय होत होती.  अशापैकी त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, परंतु ते त्यांच्या जिल्ह्याचे असल्याने त्यांना त्याद्वारे जिल्ह्यात लाभ मिळत नव्हता. त्यासाठी कागदपत्रे नसलेल्या आणि रेशन खरेदी करू न शकणा-या नागरिकांना जिल्हा परिषदेने शरद भोजन योजनेच्या तिसऱ्या टप्प्या अंतर्गत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.या साठी जिल्ह्यात आठ दिवस सर्वेक्षण करण्यात आले. त्या द्वारे लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. तर  काही नागरिकांचे अर्ज अपलोड करणे शिल्लक आहे, असे असले तरी काही काळासाटी हे सर्वेक्षण थांबवून, मंगळवार (दि.२८) पर्यंत घेण्यात आलेल्या आकडेवारीनुसार लाभार्थ्यांना येत्या १ मे पासून प्रत्यक्षात धान्य वाटप करण्यास सुरूवात करण्यात येणार आहे..................खेड तालुक्यात सर्वाधिक ४ हजार २३८ कुटुंब लाभार्थी आहेत. शिरूरमध्ये ४ हजार १२४ कुटुबांतील ११ हजार २६० नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे. तर नगपालिका हद्दीमध्ये सर्वाधिक जेजुरी नगरपालिका हद्दीमध्ये ६१६ कुटांबातील १ हजार ११३ नागरिकांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. मुळशी तालुक्यात ४ हजार १७ कुटुबांतील ११ हजार १३८ नागरिकांना, हवेलीमधील ३ हजार ४८४ कुटुबांतील ९ हजार २१० नागरिकांना, दौंडमधील १  हजार ८३१ कुटुबांतील ५ हजार ३०७ नागरिकांना, पुरंदरमधील १ हजार ५२१ कुटुबांतील ३ हजार ८८९ नागरिकांना, भोरमधील १ हजार ४९६ कुटुबांतील ४ हजार १०२ नागरिकांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये अडीच किलो गहू आणि अडीच किलो तांदुळ असणार आहेत................................शरद भोजन योजना गरजुंसाठी लाभाची ठरत आहे. या योजनेच्या तिसरा टप्यात लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे पासून करण्यात येणार आहे.  प्रत्येक व्यक्तीला गहू आणि तांदुळ देण्यात येणार आहे. कोणताही पात्र लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही आणि योजनेचा गैरवापर होणार नाही याबाबत सूचना केलेल्या आहेत.- रणजीत शिवतरे, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद--------------------------

टॅग्स :PuneपुणेKhedखेडShirurशिरुरJejuriजेजुरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार