शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्र्यांवर खून, भ्रष्टाचाराचे आरोप; डाग लागलेल्यांचे राजीनामे तत्काळ घ्या - नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 10:10 IST

महाराष्ट्राला काळिमा लावणे व महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे काम हे सरकार करत आहे

पुणे: ‘राज्य सरकार मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्र्यांवर खून, भ्रष्टाचारासह वेगवेगळे आरोप आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदारच, त्यांच्या मंत्र्यांवर आरोप करत आहेत. सरकारला जनाची नसेल, तर मनाची लाज बाळगून सरकारने डाग लागलेल्या मंत्र्यांचे राजीनामे तत्काळ घ्यावेत.’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. सध्याचे सरकार हे महाराष्ट्र लुटणारे आणि खोटे एन्काऊंटर करणारे सरकार आहे. त्यावर उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मोदीबाग येथील निवासस्थानी पटोले यांनी भेट घेतली. यावेळी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अजित दरेकर आदी उपस्थित होते. पवार यांच्या समवेतच्या भेटीमागील कारण सांगताना पटोले म्हणाले, ‘विधिमंडळाच्या समित्यांबाबतची माहिती विधानसभा अध्यक्षांना द्यायची आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या नावाचीही चर्चा करून द्यायची होती.

महाराष्ट्राला काळिमा लावणे व महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे काम हे महाजंगलराज सरकार करत आहे.' अशी टीका पटोले यांनी केली. ते म्हणाले, ‘राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा केले जात होते, त्या योजनेमध्ये तत्कालीन कृषिमंत्र्यांनी बदल केले. हे बदल नेमके कशासाठी केले, कॅबिनेटने त्यास का मान्यता दिली, असे प्रश्न उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारले आहेत. शेतकऱ्यांच्या टाळुवरचे लोणी खाण्याचे काम सरकारने केले आहे. कृषी साहित्य किमतीपेक्षा चार पट जादा दराने घेऊन त्यामध्ये भ्रष्टाचार करण्यात आला होता. त्यावेळच्या आयुक्तांनी त्यास विरोध केल्यामुळे त्यांचीही बदली करण्यात आली होती. एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत आहे, तर दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांच्या योजनांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे, असे पटोले म्हणाले.

पक्षात लवकरच मोठे बदल होणार

आमच्या पक्षात लोकशाही आहे, माझ्या प्रदेशाध्यक्षपदाला चार वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे माझ्या जागी दुसरा बदल करावा, याबाबत मी स्वतः पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र दिलेले आहे. पक्षात संघटनात्मक बदल करण्याचे अधिकार हायकमांडच्या हातात आहेत, त्यादृष्टीने येत्या काळात पक्षात मोठे फेरबदल होतील, असे नाना पटोले यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेNana Patoleनाना पटोलेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणMLAआमदारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारcongressकाँग्रेसBJPभाजपा