शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्र्यांवर खून, भ्रष्टाचाराचे आरोप; डाग लागलेल्यांचे राजीनामे तत्काळ घ्या - नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 10:10 IST

महाराष्ट्राला काळिमा लावणे व महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे काम हे सरकार करत आहे

पुणे: ‘राज्य सरकार मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्र्यांवर खून, भ्रष्टाचारासह वेगवेगळे आरोप आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदारच, त्यांच्या मंत्र्यांवर आरोप करत आहेत. सरकारला जनाची नसेल, तर मनाची लाज बाळगून सरकारने डाग लागलेल्या मंत्र्यांचे राजीनामे तत्काळ घ्यावेत.’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. सध्याचे सरकार हे महाराष्ट्र लुटणारे आणि खोटे एन्काऊंटर करणारे सरकार आहे. त्यावर उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मोदीबाग येथील निवासस्थानी पटोले यांनी भेट घेतली. यावेळी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अजित दरेकर आदी उपस्थित होते. पवार यांच्या समवेतच्या भेटीमागील कारण सांगताना पटोले म्हणाले, ‘विधिमंडळाच्या समित्यांबाबतची माहिती विधानसभा अध्यक्षांना द्यायची आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या नावाचीही चर्चा करून द्यायची होती.

महाराष्ट्राला काळिमा लावणे व महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे काम हे महाजंगलराज सरकार करत आहे.' अशी टीका पटोले यांनी केली. ते म्हणाले, ‘राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा केले जात होते, त्या योजनेमध्ये तत्कालीन कृषिमंत्र्यांनी बदल केले. हे बदल नेमके कशासाठी केले, कॅबिनेटने त्यास का मान्यता दिली, असे प्रश्न उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारले आहेत. शेतकऱ्यांच्या टाळुवरचे लोणी खाण्याचे काम सरकारने केले आहे. कृषी साहित्य किमतीपेक्षा चार पट जादा दराने घेऊन त्यामध्ये भ्रष्टाचार करण्यात आला होता. त्यावेळच्या आयुक्तांनी त्यास विरोध केल्यामुळे त्यांचीही बदली करण्यात आली होती. एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत आहे, तर दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांच्या योजनांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे, असे पटोले म्हणाले.

पक्षात लवकरच मोठे बदल होणार

आमच्या पक्षात लोकशाही आहे, माझ्या प्रदेशाध्यक्षपदाला चार वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे माझ्या जागी दुसरा बदल करावा, याबाबत मी स्वतः पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र दिलेले आहे. पक्षात संघटनात्मक बदल करण्याचे अधिकार हायकमांडच्या हातात आहेत, त्यादृष्टीने येत्या काळात पक्षात मोठे फेरबदल होतील, असे नाना पटोले यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेNana Patoleनाना पटोलेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणMLAआमदारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारcongressकाँग्रेसBJPभाजपा