शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

राज्यात रब्बीची ६० टक्के पेरणी : पुणे विभागात पाण्याअभावी पिके सुकली  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 6:43 PM

राज्याच्या कृषी विभागातर्फे जानेवारी अखेरपर्यंतचा पीक पेरणी परिस्थितीचा अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे.

ठळक मुद्देरब्बी पिकाचे सरासरी क्षेत्र ५६.९३ लाख हेक्टर असून आत्तापर्यंत ३३.९५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी

पुणे: राज्यात परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे रब्बी पिकाच्या पेरणीवर परिणाम झाला असून जानेवारी महिना अखेरपर्यंत राज्यातील रब्बी पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ ६० टक्के क्षेत्रावर रब्बी पेरणी झाली आहे.त्यात रब्बी ज्वारी पिक वाढीच्या,पोटरी ते दाणे भरणेच्या अवस्थेत,गहू पिक फुटवे फुटणे ते ओंबीच्या अवस्थेत तर करडई पीक फुलोरा, बोंडे धरणे आणि काही ठिकाणे बोंडे पक्वतेच्या अवस्थेत आहेत.मात्र,पावसा आभावी पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे बहुतांश पिकांच्या उत्पादनामध्ये घट होणार आहे,असा अहवाल कृषी विभागातर्फे प्रसिध्द करण्यात आला आहे.राज्याच्या कृषी विभागातर्फे जानेवारी अखेरपर्यंतचा पीक पेरणी परिस्थितीचा अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात रब्बी पिकाचे सरासरी क्षेत्र ५६.९३ लाख हेक्टर असून आत्तापर्यंत ३३.९५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामुळे राज्यात जानेवारी अखेरपर्यंत (दि.25) ६० टक्के रब्बीच्या क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात मका,ज्वारी पिकावर लष्कर अळीचा प्रादूर्भाव असून एकट्या सातारा जिल्ह्यात ३०३ हेक्टर क्षेत्रावर मका पिकावर आणि ४४.८ हेक्टर क्षेत्रावर लष्कर अळीचा प्रादूर्भाव झाला आहे. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यात ऊस पिकावर १४ हजार १११ हेक्टर क्षेत्रावर हुमणी किडीचा प्रादूर्भाव दिसून आला आहे.राज्यात कोकण विभागात ९४ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली असून उन्हाळी भात व भुईमुग पिकांकरीता जमिनीच्या पूर्वमशागतीची कामे सुरू आहेत. तसेच विभागात काही ठिकाणी उन्हाळी भात रोपवाटीका तयार करण्याची कामे केली जात आहेत. नाशिक विभागात आत्तापर्यंत ५६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून हरभरा पिकावर घाटे अळी या किडीचा व मर रोगाचा प्रादूर्भाव दिसून आला आहे. तसेच कोल्हापूर विभागात ७१ टक्के क्षेत्रावर ,लातूरमध्ये ७० टक्के,अमरावती विभागात ८८ तर नागपूर विभागात ९१ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली आहे. औरंगाबाद विभागात सर्वात कमी २.६८ लाखे हेक्टर म्हणजेच केवळ ३५ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली असल्याचे कृषी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

...............

पुणे विभागात रब्बी पिकाखालील सरासरी क्षेत्र १७.८३ लाखे हेक्टर असून २५ जानेवारी अखेरपर्यंत ७.७७ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. त्यामुळे विभागात केवळ ४४ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली. त्याचप्रमाणे परतीच्या पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे जमिनीतील ओलाख्या आभावा जिरायत पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून पिके सुकू लागली आहेत.त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरीagricultureशेती