शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

७९ लाख पुणेकरांची तहान भागवण्यासाठी २१ टीएमसी पाणी; जलसंपदा विभाग पाण्याचा किती कोटा मंजूर करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 12:52 IST

पुणे महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक अर्थात वॉटर बजेट जलसंपदा विभागाला सादर करत वाढीव पाण्याची मागणी केली

पुणे: पुणे महापालिका हद्दीत ३४ गावांचा झालेला समावेश आणि दरवर्षी वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून शहराला २०२४-२५ या वर्षासाठी २१.४८ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. नोकरी, शिक्षक, व्यवसायानिमित्त शहरात दररोज ये-जा करणारे नागरिक आदी गृहीत धरून पुढील वर्षभरात किमान ७९ लाख ३९ हजार ९७४ इतक्या लोकसंख्येला पाणी द्यावे लागणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभाग पाण्याचा कोटा किती मंजूर करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार महापालिकेला दरवर्षी पाटबंधारे विभागाला पाण्याचे अंदाजपत्रक सादर करावे लागते. त्यानुसार पुणे महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक अर्थात वॉटर बजेट जलसंपदा विभागाला सादर करत वाढीव पाण्याची मागणी केली आहे.

पुणे शहराला खडकवासला धरण प्रकल्प, भामा आसखेड धरण, रावेत बंधारा या ठिकाणावरून पाणीपुरवठा केला जातो; पण शहराचा बहुतांश भाग खडकवासला धरण प्रकल्पावर अवलंबून आहे. शहरात नोकरी, शिक्षक, व्यवसायासाठी रोज ये-जा करणारे नागरिक यांना गृहीत धरून पुढील वर्षभरात किमान ७९ लाख ३९ हजार ९७४ इतक्या लोकसंख्येला पाणी द्यावे लागणार आहे. तसेच पाणी गळती ३५ टक्के ग्राह्य धरून २०२४-२५ या वर्षासाठी पाणीपुरवठा विभागाने २१.४८ टीएमसी पाण्याची मागणी करणारे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सादर केले आहे.

पुणे महापालिकेत २०१७ मध्ये ११ गावे आणि २०२१ मध्ये २३ गावे अशी एकूण ३४ गावे समाविष्ट झालेली आहेत. या गावांची लोकसंख्या ११ लाख १४ हजार ७१४ इतकी गृहीत धरून पाण्याची मागणी केली जात होती; पण महापालिकेने केलेल्या सुधारित अभ्यासात ३४ गावांची लोकसंख्या १८ लाख ११ हजार ३४० इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये धायरी, नांदोशी, नांदेड, कोंढवे धावडे, आंबेगाव खुर्द, उरुळी देवाची, फुरसुंगी, मुंढवा-केशवनगर, मांजरी या गावांची लोकसंख्या आठ लाख ३१३ इतकी आहे. येथे बल्क मीटरनुसार प्रतिमानसी १२० लिटर प्रतिदिन पाणी दिले जाते, तर उर्वरित गावांमध्ये १० लाख ११ हजार २६ इतकी लोकसंख्या आहे. या भागात जलवाहिनीचे प्रमाण कमी असल्याने टँकरची संख्येत ४० टक्क्यांनी वाढ केली आहे.

पाण्याची गळती होणार कमी

महापालिका हद्दीमधील वितरण व्यवस्था जुनी असल्या कारणाने पाणी गळतीचे प्रमाण ३५ टक्के आहे. पुणे महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी गळतीचे प्रमाण कमी होणार आहे.

असे आहे पाण्याचे अंदाजपत्रक

जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा - ११.१७ टीएमसीटँकरद्वारे पाणीपुरवठा - ०.१९ टीएमसीसमाविष्ट गावांसाठी - २.१५ टीएमसीतरल लोकसंख्येसाठी - ०.१७ टीएमसीव्यावसायिक पाणीवापर - ०.३३ टीएमसी३५ टक्के पाण्याची गळती - ७.७२ टीएमसी

एकूण - २१.४८ टीएमसी

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीNatureनिसर्गDamधरणRainपाऊसenvironmentपर्यावरणFamilyपरिवारHomeसुंदर गृहनियोजनStudentविद्यार्थी