शहरं
Join us  
Trending Stories
1
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
2
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
3
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
4
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
5
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
6
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी
7
स्टाइल मारणं महागात पडलं...! रीलसाठी तोंडात फोडले ६ फटाके, ७ वा सुतळी बॉम्ब फुटला अन् १८ वर्षांच्या तरुणाचा अख्खा जबडाच उडाला!
8
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
9
VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!
10
स्वतः जेवण बनवले, मुक्कामी राहिले, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सातपुडा पर्वतरांगातील आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी
11
लय भारी! घरात तुळस लावल्याने काय होतं? आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितले जबरदस्त फायदे
12
सौदीसाठी भाड्याने लढणार २५ हजार पाकिस्तानी सैनिक; 'सीक्रेट डील'चा खुलासा, चीन, भारताचाही उल्लेख
13
Chhath Puja 2025: छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढांसह भाजपा नेते घेणार तयारीचा आढावा
14
दक्षिण आफ्रिकेच्या पाकिस्तानवरील विजयाने भारताला फायदा, WTCच्या गुणतक्त्यात मोठी उलथापालथ
15
VIDEO: लेहंगा घालून लंडनच्या रस्त्यावर निघाली भारतीय मुलगी, पुढे लोकांनी काय केलं पाहा
16
पत्नीचं नाव 'मोटी' म्हणून सेव्ह केलं, प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं अन् मग...!
17
बाल्कनीतून पाय घसरला, पती ग्रिलवर लटकला; वाचवण्यासाठी पत्नी धावली, पण नियतीने डाव साधला!
18
डोळे हे जुलमी गडे! सुंदर दिसण्याची हौस महागात, रोज लायनर, काजळ लावल्यास मोठं नुकसान
19
जिद्दीला सॅल्यूट! अवघ्या २२ व्या वर्षी झाली IAS; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
20
Viral Video: गळ्यात गमछा, कमरेला लुंगी! भोजपुरी गाण्यावर तरुणीचा जबरदस्त डान्स, नेटकरी झाले फिदा

Video: “देशात नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात; जे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवू”

By प्रविण मरगळे | Updated: September 28, 2020 15:54 IST

आपण सगळे एकत्र येऊन या निवडणुकीत सरकार पाडू शकतो. या बिहार निवडणुकीत एनडीएचा पराभव करणे हेच आमचं उद्दिष्ट आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देबिहारमध्ये मुस्लीम, आंबेडकरवादी, आदिवासी मिळून ४० टक्के लोकसंख्या आहे.आपण सगळे एकत्र येऊन या निवडणुकीत सरकार पाडू शकतो. बिहार निवडणुकीत एनडीएचा पराभव करणे हेच आमचं उद्दिष्ट आहे

मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजल्यानंतर आता प्रत्येक राजकीय पक्षाने दंड थोपटले आहेत. कोरोना आणि लॉकडाऊन काळातील ही पहिलीच निवडणूक असल्याने सगळ्यांचे याकडे लक्ष आहे. यातच वंचित बहुजन आघाडीनेही बिहार निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. जे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये होऊ शकतं असं सांगत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमला साद दिली आहे.

याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशभरात नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात एमआयएमसोबत आम्ही लोकसभा निवडणुकीत लढलो, त्यात एक जागा एमआयएमला मिळाली, विधानसभा निवडणुकीत हे समीकरण चाललं असतं परंतु जागावाटपावरुन दोघांमध्ये तडजोड झाली नाही, एमआयएमने १०० जागा मागितल्या, त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला, आता बिहार निवडणुका आहेत, जे महाराष्ट्रात झाले नाही ते बिहारमध्ये होऊ शकते असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच बिहारमध्ये मुस्लीम, आंबेडकरवादी, आदिवासी मिळून ४० टक्के लोकसंख्या आहे. इतक्या मोठ्या जनाधाराने कोणत्याही सरकारला पाडू शकतो. हे सरकार नागरिकता आणि आरक्षणाच्या विरोधात आहे. मौलवी, मौलाना यासह जे शिक्षित मुसलमान आहेत त्यांनी याबाबत विचार करायला हवा. आपण सगळे एकत्र येऊन या निवडणुकीत सरकार पाडू शकतो. या बिहार निवडणुकीत एनडीएचा पराभव करणे हेच आमचं उद्दिष्ट आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

बिहारमध्ये दिवाळीपूर्वीच 'फटाके फुटणार

बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी विधानसभेच्या २४३ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी तारखांची घोषणा केली. त्यानुसार, बिहारमधील विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात होणार असून २८ ऑक्टोबर रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. तर, निवडणुकांचा निकाल १० नोव्हेंबर रोजी लागणार आहे. म्हणजेच दिवाळीपूर्वीच बिहारमध्ये फटाके फुटणार आहेत.

बिहार विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया २९ नोव्हेंबरपूर्वीच संपणार आहे. राज्यात २८ ऑक्टोबर रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार असून ३ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेण्यात येईल. निवडणुकांचा अंतिम टप्पा ७ नोव्हेंबर रोजी पडणार असून ३ दिवसांत म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यामुळे, दिवाळीपूर्वीच बिहारमध्ये कोणत्या पक्षाचे सरकार स्थापन होणार, हे स्पष्ट होणार आहे. दिवाळीपूर्वीच मतदार आणि उमेदवारांची दिवाळी साजरी होणार आहे. देशात १४ नोव्हेंबर रोजी दिवाळीला सुरूवात होत आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन