शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

Goa Politics: “एका तिकिटावर निवडून यायचं अन् निर्लज्जपणे दुसऱ्या पक्षात उडी मारायची हे थांबवावं लागेल”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 14:16 IST

पणजी इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, युती आणि आघाडीचं राजकारण न करता गोव्यात आम्ही स्वबळावर लढणार आहोत.

ठळक मुद्देआमच्याकडे निर्लज्ज येत नाहीत. शक्यतो निर्लज्जांना शिवसेना घेत नाहीगोव्यात चांगली राजकारणी झालेत. इथं परंपरा आहे. परंतु आत्ताचं राजकारण निर्लज्जतेच्या पातळीवर गेले आहे मागील निवडणुकीत आमच्या वाट्याला ३ जागा आल्या होत्या. आम्ही आघाडीत निवडणूक लढवली.

गोवा – उत्तर प्रदेशपाठोपाठ शिवसेनेने गोवा विधानसभा निवडणुकीतही उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी गोव्यात सुरु असलेल्या राजकीय हालचालींवर शिवसेनेने टीकास्त्र सोडलं आहे. एका तिकिटावर निवडून यायचं आणि निर्लज्जपणे दुसऱ्या पक्षात सत्तेसाठी उडी मारायची हे थांबवावं लागेल. गोव्यातील जनतेनं हे रोखलं पाहिजे. पक्षांतर कसं थांबवायचं याची योजना शिवसेनेकडे आहे. आणखी किती काळ गोव्यात पक्षांतर चालणार? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांनी विचारला आहे.

पणजी इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, युती आणि आघाडीचं राजकारण न करता गोव्यात आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आमच्याकडे निर्लज्ज येत नाहीत. शक्यतो निर्लज्जांना शिवसेना घेत नाही. एका पक्षातून निवडून येत दुसऱ्या पक्षात उडी मारायची हा खेळ गोव्यात सुरू आहे. गोव्यात चांगली राजकारणी झालेत. इथं परंपरा आहे. परंतु आत्ताचं राजकारण निर्लज्जतेच्या पातळीवर गेले आहे असं त्यांनी आरोप केला. संजय राऊत यांच्यासोबत खासदार राहुल शेवाळेही यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

तसेच मागील निवडणुकीत आमच्या वाट्याला ३ जागा आल्या होत्या. आम्ही आघाडीत निवडणूक लढवली. ज्याठिकाणी शिवसेनेचा काही संबंध नाही अशा जागा आमच्या वाट्याला आल्या. परंतु आम्ही लढलो. राजकारणात इकडून तिकडे उड्या मारण्याचे खेळ अगदी दिल्लीपर्यंत सुरू आहेत. कोणी कुठंही उडी मारतो पण त्यातून गोव्याच्या हाती काय लागणार? गोवेकरांनी नवीन पर्याय उभे केले जात आहे त्यांना साथ द्यायची की नाही हे शेवटी जनताच ठरवेल असंही राऊत म्हणाले.

दरम्यान, संपूर्ण गोव्याला अंमली पदार्थांचा विळखा पडलेला आहे. गोव्यात कॅसिनोचा, जुगाराचा कहर आहे. त्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करतच भाजप तिकडे सत्तेवर आली. मात्र, त्या सगळ्याला आता भाजपचा पाठिंबा आहे. कोरोनाकाळात गोव्याची अवस्था वाईट झाली आहे. ड्रग्समाफियांच्या ताब्यात गोवा अडकला आहे. भाजपा फारच थापा मारत आहे. त्यासाठी तिकडे जाणे गरजेचे आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आम्ही महाराष्ट्रात कोणताही पक्ष फोडला नाही

आम्ही महाराष्ट्रात कोणताही पक्ष फोडला नाही. भाजप कोणाला तरी फोडायचा प्रयत्न करत आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून ते कोणावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र आणि गोव्याची तुलना करता येणार नाही. भाजपने गोव्यात अनेकदा तोडफोड करत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची इच्छा जनतेची आहे आणि ते शिवसेनाच करू शकते. आमचे गोव्यात प्राबल्य आहे असं संजय राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा