शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

काँग्रेसच्या आणखी एका आमदाराचा राजीनामा; राज्यसभा निवडणुकीचं गणित बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 13:39 IST

अडचणीच्या काळात गुजरात काँग्रेसला एकापाठोपाठ एक झटके मिळत आहेत. मार्चपासून आतापर्यंत काँग्रेसच्या ७ आमदारांनी राजीनामा दिला आहे.

अहमदाबाद – गुजरातमध्ये १९ जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का मिळाला आहे. काँग्रेसचेआमदार बृजेश मेरजा यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी काँग्रेसच्या अक्षय पटेल आणि जीतू चौधरी यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनाम दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी दोघांचे राजीनामे स्वीकारले आहे.

अडचणीच्या काळात गुजरात काँग्रेसला एकापाठोपाठ एक झटके मिळत आहेत. मार्चपासून आतापर्यंत काँग्रेसच्या ७ आमदारांनी राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसकडे ६५ आमदारांचे संख्याबळ राहिलं आहे. गुजरात विधानसभेत एकूण १७२ सदस्य आहेत. तर १० जागा रिक्त आहेत. गुजरातमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी १९ जूनला निवडणूक होणार आहे. यातील ३ जागा सध्या भाजपाकडे तर उर्वरित एक जागा काँग्रेसकडे आहे.

नियमांनुसार, राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी उमेदवाराकडे सिंगल ट्रासफरेबल वोट अंतर्गत ३६ मतांची गरज असते. भाजपाकडे १०३ आमदार आहेत, भाजपाने राज्यसभेसाठी अभय भारद्वाज, रमीलाबेन बारा आणि नरहारी अमीन यांना उमेदवारी दिली आहे. आकडेवारीकडे पाहिली तर भाजपाच्या २ जागा सहज निवडून येतील पण तिसऱ्या जागेसाठी काही मतांची आवश्यकता भासणार आहे.

दुसरीकडे कॉंग्रेसने शक्तीसिंह गोहिल आणि भरतसिंग सोलंकी यांना उमेदवारी दिली आहे पण एकामागून एक कॉंग्रेसच्या आमदारांचे राजीनामा दिल्याने पक्षाची अडचण झाली आहे. भारतीय आदिवासी पक्षाचे विधानसभेत (बीटीपी) दोन आमदार आहेत, एक राष्ट्रवादी आणि अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी आहेत. राजीनामा सत्रामुळे आता सर्वांचे लक्ष या आमदारांच्या मताकडे लागले आहे.

काय आहे गणित?

यावेळी गुजरातमध्ये राज्यसभेच्या ४ जागा रिक्त आहेत. गुजरात विधानसभेत भाजपाकडे १०३ आमदार आहेत. कॉंग्रेसचे ६८ आमदार आहेत, भारतीय आदिवासी पार्टीचे दोन (बीटीपी) आणि राष्ट्रवादीचे एक आमदार आहे. राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी ३६ मते आवश्यक आहेत. आत्तापर्यंत कॉंग्रेस २ बीटीपी आमदार व एक अपक्ष अशी त्यांची संख्या ७१ मानत होती. अशा प्रकारे काँग्रेस सहजपणे २ जागा जिंकण्याचे स्वप्न पाहत होती. दुसरीकडे ३ जागांवर विजय मिळवण्यासाठी भाजपला १०६ आमदारांची गरज भासणार आहे. याचा अर्थ असा की भाजपाला तिन्ही उमेदवार जिंकण्यासाठी आणखी ३ मतांची आवश्यकता असेल. तिसरा उमेदवार म्हणून भाजपाने नरहरी अमीन यांना उमेदवारी दिली आहे.

२०१७ सारखी पुन्हा परिस्थिती

गुजरात पुन्हा एकदा २०१७ सारखी परिस्थिती दिसत आहे. २०१७ मध्ये गुजरातमध्ये भाजपाने अतिरिक्त उमेदवार उभे करुन कॉंग्रेसचे दिग्गज अहमद पटेल यांची जागा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कॉंग्रेसच्या ६ आमदारांनी निवडणुकीच्या अगदी आधी राजीनामा दिला होता. एक मत रद्दबातल झाल्यामुळे अहमद पटेल निवडून आले होते. पण त्यासाठी कॉंग्रेसला निवडणूक आयोगापासून सर्वोच्च न्यायालयात संघर्ष करावा लागला

अन्य महत्त्वाच्या बातम्या

...अन् ७ वर्षाच्या मुलीने थेट पोलीस ठाणे गाठलं; घडलेला प्रकार ऐकून पोलीसही हादरले

शेतात काम करताना जमिनीत नांगर अडकला; शेतकऱ्याला सोने-रत्नांचा मोठा खजिना सापडला

बाबो! नवरी नटली अन् गावभर चर्चा झाली; एक दोन नव्हे तर तब्बल १०० किलोचा घागरा

हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी फॉर्म भरावा लागणार; Entry आणि Exit पर्यंत ‘या’ ७ गोष्टी विसरु नका!

आश्चर्य! जगात केवळ एकच व्यक्ती खरेदी करु शकणार ‘ही’ ढासू बाईक; काय आहे स्पेशल?

टॅग्स :congressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकMLAआमदारBJPभाजपा