शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

राजस्थानच्या राजकीय घडामोडींचे पडसाद महाराष्ट्रात उमटले; महाविकास आघाडी सरकार अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 15:13 IST

Rajasthan Political Crisis: रात्री उशिरा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

ठळक मुद्देराजस्थानच्या घडामोडीनंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट झालं आहेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवादावर भर देत कोणीही नाराज होऊ नये यासाठी प्रयत्न सुरु केलेतबाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास १ तास चर्चा

मुंबई – राजस्थानमध्येकाँग्रेस सरकारवर संकट आलं असताना त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहे. महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. स्व. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात ही बैठक झाली. 

बाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास १ तास चर्चा झाली, काँग्रेसचे मंत्री नाराज असल्याची चर्चा होती, तेव्हा बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती, या चर्चेनंतरही ज्या ठरलेल्या गोष्टी आहेत त्या होताना दिसत नाही अशी नाराजी असल्याचं सांगण्यात येत आहे. राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबाबतही चर्चा करण्यात आली.

शरद पवारांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर भाष्य केले होते, उद्धव ठाकरे उत्तम राज्य सांभाळत आहेत पण सरकार तीन पक्षांचं मिळून असल्याने त्यांनी संवादावर जास्त भर दिला पाहिजे, अलीकडेच मुंबई पोलिसांच्या बदलीप्रकरणात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील बेबनाव समोर आला होता. त्यानंतर शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती, त्यात यापुढे कोणत्याही प्रशासकीय बदल्या करताना आधी चर्चा मग बदली अशी भूमिका महाविकास आघाडीने स्वीकारली होती. (Sharad Pawar Meet CM Uddhav Thackrey)

राजस्थानच्या घडामोडीनंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवादावर भर देत कोणीही नाराज होऊ नये यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. रात्री उशिरा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

राजस्थानमध्ये सध्या काय सुरु आहे?

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर सरकार अस्थिर होण्याचं संकट आहे. (Rajasthan Political Crisis) उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण हाती घेतल्यामुळे ही परिस्थिती उद्भावली आहे. सचिन पायलट यांनी ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे तर सोमवारी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस आमदारांचे शक्तीप्रदर्शन करुन सरकारला कोणताही धोका नसल्याचा विश्वास दाखवला आहे. राजस्थानमधील सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपाचं पडद्यामागून कार्य सुरु आहे असा आरोप शिवसेनेने सामना अग्रलेखातून केला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातSharad Pawarशरद पवारRajasthanराजस्थानcongressकाँग्रेस