शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

राजस्थानच्या राजकीय घडामोडींचे पडसाद महाराष्ट्रात उमटले; महाविकास आघाडी सरकार अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 15:13 IST

Rajasthan Political Crisis: रात्री उशिरा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

ठळक मुद्देराजस्थानच्या घडामोडीनंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट झालं आहेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवादावर भर देत कोणीही नाराज होऊ नये यासाठी प्रयत्न सुरु केलेतबाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास १ तास चर्चा

मुंबई – राजस्थानमध्येकाँग्रेस सरकारवर संकट आलं असताना त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहे. महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. स्व. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात ही बैठक झाली. 

बाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास १ तास चर्चा झाली, काँग्रेसचे मंत्री नाराज असल्याची चर्चा होती, तेव्हा बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती, या चर्चेनंतरही ज्या ठरलेल्या गोष्टी आहेत त्या होताना दिसत नाही अशी नाराजी असल्याचं सांगण्यात येत आहे. राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबाबतही चर्चा करण्यात आली.

शरद पवारांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर भाष्य केले होते, उद्धव ठाकरे उत्तम राज्य सांभाळत आहेत पण सरकार तीन पक्षांचं मिळून असल्याने त्यांनी संवादावर जास्त भर दिला पाहिजे, अलीकडेच मुंबई पोलिसांच्या बदलीप्रकरणात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील बेबनाव समोर आला होता. त्यानंतर शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती, त्यात यापुढे कोणत्याही प्रशासकीय बदल्या करताना आधी चर्चा मग बदली अशी भूमिका महाविकास आघाडीने स्वीकारली होती. (Sharad Pawar Meet CM Uddhav Thackrey)

राजस्थानच्या घडामोडीनंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवादावर भर देत कोणीही नाराज होऊ नये यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. रात्री उशिरा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

राजस्थानमध्ये सध्या काय सुरु आहे?

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर सरकार अस्थिर होण्याचं संकट आहे. (Rajasthan Political Crisis) उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण हाती घेतल्यामुळे ही परिस्थिती उद्भावली आहे. सचिन पायलट यांनी ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे तर सोमवारी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस आमदारांचे शक्तीप्रदर्शन करुन सरकारला कोणताही धोका नसल्याचा विश्वास दाखवला आहे. राजस्थानमधील सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपाचं पडद्यामागून कार्य सुरु आहे असा आरोप शिवसेनेने सामना अग्रलेखातून केला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातSharad Pawarशरद पवारRajasthanराजस्थानcongressकाँग्रेस