शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधील आणखी एक नेता भाजपाच्या गळाला?; काँग्रेस सरकार अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 9:04 AM

मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद वाढत चालल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

ठळक मुद्देमध्यप्रदेशनंतर भाजपाचा मोर्चा राजस्थानच्या दिशेनेकाँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपाच्या हालचाली, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा आरोपसचिन पायलट आणि समर्थक मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला लावली गैरहजेरी

नवी दिल्ली – काँग्रेसच्या ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात सामील केल्यानंतर मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार कोसळलं. आता भाजपानेराजस्थानकडे आपला मोर्चा वळवला आहे. राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर संकट उभं राहिलं आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपावर सरकार पाडण्याचा आरोप केला आहे. शनिवारी राजस्थानमधील राजकीय हालचालींना जोरदार वेग आला आहे.

मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद वाढत चालल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ज्यावेळी सचिन पायलट दिल्लीत होते त्यावेळी या चर्चांना उधाण आलं. इतकचं नाही तर शनिवारी रात्री राजस्थानमधील २४ आमदार हरियाणातील एका मोठ्या हॉटेलमध्ये पोहचले. मध्य प्रदेशात ज्याप्रकारे शिंदे समर्थक आमदारांना हरियाणा आणि कर्नाटकात एका रिसोर्टमध्ये नेलं होतं तशीच स्थिती राजस्थानमध्ये होताना दिसत आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या यंग ब्रिगेडमधील महत्त्वाचे सदस्य सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांची एकमेकांसोबत घट्ट मैत्री आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये  घडणाऱ्या घडामोडीतून सचिन पायलट हेदेखील भाजपाच्या (BJP) संपर्कात असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पक्षाकडून आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न झाला असता अनेक आमदारांनी फोन स्विचऑफ केल्याचं आढळलं. काँग्रेसचे महासचिव आणि राज्य प्रभारी अविनाश पांडे शनिवारी जयपूरला पोहचले आहेत.

वेगवान राजकीय घडामोडींमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी रात्री उशिरा मंत्र्यांची बैठक बोलावली. (Rajasthan Politics) ज्यात सचिन पायलट आणि समर्थक मंत्री गैरहजर होते, सचिन पायलट हे दिल्लीला असल्याने बैठकीला हजर राहू शकले नाहीत असं सांगण्यात आलं. पण प्रदेशाध्यक्ष असूनही राज्यात सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री पद न मिळाल्याने सुरुवातीपासून सचिन पायलट नाराज असल्याचं दिसून आलं होतं.

सरकार स्थिर, पाच वर्षे टिकणार : गेहलोत

पोलिसांनी केलेल्या या कारवाईची माहिती उघड होताच सरकार पाडण्याचे हे कारस्थान भाजपा करत असल्याचा आरोप करणारे पत्रक काँग्रेसच्या २० आमदारांनी जारी केले. त्यानंतर मुख्यमंत्री गेहलोत यांनी पत्रकार परिषद घेऊन हाच आरोप उघडपणे केला. ते म्हणाले की, कोरोनाची महामारी सुरु असताना सरकार पाडण्याचे हे उद्योग करणे हे भाजपाला माणुसकीची जराही चाड नसल्याचेच द्योतक आहे. परंतु आमचे सरकार भक्कम आहे, ते यापुढेही भक्कम राहील व पूर्ण पाच वर्षे टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया, उपनेते राजेंद्र राठोड व प्रदेश भाजपाचे अध्यक्ष सतीश पूनिया त्यांच्या दिल्लीतील नेत्यांच्या इशाऱ्यावरून हे उद्योग करत आहेत, असा थेट आरोप गेहलोत यांनी केला.

टॅग्स :Rajasthanराजस्थानcongressकाँग्रेसBJPभाजपाJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेMadhya Pradeshमध्य प्रदेशRahul Gandhiराहुल गांधी