शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबणीवर?; मनसेचा वर्धापन दिन सोहळा यंदा रद्द, त्याऐवजी राज्यभरात...

By प्रविण मरगळे | Updated: March 6, 2021 17:10 IST

MNS president Raj Thackeray's visit to Ayodhya is likely to be postponed: ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी सदस्य सुरू होईल, जागोजागी नोंदणी होणार आहे त्यामुळे गर्दीचा प्रश्न उद्भवणार नाही. तसेच अद्याप राज ठाकरे यांच्या भाषणाबद्दल काही नियोजन नाही असंही नितीन सरदेसाईंनी सांगितले.

ठळक मुद्देदरवर्षी ९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा साजरा होताराज ठाकरे आणि गर्दी हे कायम समीकरण असतं, परंतु ही गर्दी टाळण्यासाठी यंदाचा वर्धापन दिन सोहळा रद्द करण्यात आला आहेमनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ९ मार्चच्या वर्धापन दिनापूर्वी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती होती

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णवाढीच्या संख्येमुळे ठाकरे सरकारनं नियमावली जारी केली आहे, त्यानुसार कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राजकीय, धार्मिक, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट नवनिर्माण सेनेचा ९ मार्च रोजी होणारा वर्धापन दिन सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.

याबाबत नितीन सरदेसाई म्हणाले की, दरवर्षी ९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा साजरा होता, गेल्यावर्षी हा सोहळा वाशीच्या सभागृहात झाला होता, राज ठाकरे आणि गर्दी हे कायम समीकरण असतं, परंतु ही गर्दी टाळण्यासाठी यंदाचा वर्धापन दिन सोहळा रद्द करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली.  

परंतु ९ मार्च रोजी राज्यभरात मनसेचे कार्यकर्ते मनसे सदस्य मोहिमेला सुरूवात करतील, पक्षसदस्य नोंदणीचा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी सदस्य सुरू होईल, जागोजागी नोंदणी होणार आहे त्यामुळे गर्दीचा प्रश्न उद्भवणार नाही. तसेच अद्याप राज ठाकरे यांच्या भाषणाबद्दल काही नियोजन नाही असंही नितीन सरदेसाईंनी सांगितले.

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबणीवर....?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ९ मार्चच्या वर्धापन दिनापूर्वी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी देण्यात आली होती. मात्र शेतकरी आंदोलनामुळे अद्याप या दौऱ्याचं नियोजन झालं नाही, याबाबत येत्या १-२ दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेऊन तारीख निश्चित केली जाईल अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी लोकमत ऑनलाईनशी बोलताना दिली.

मास्क न वापरण्यावरून संजय राऊतांनी लगावला होता टोला

पंतप्रधान, मुख्यमंत्री सांगतात मास्क वापरा, तसं राज ठाकरेंनी मास्क का वापरू नये हे पटवून द्यावं, मास्क न वापरणे नागरिकांसाठी धोकादायक आहे, अजित पवारांनीही विधानसभेत तेच सांगितले, ते स्वत: या संकटातून गेलेत, मुख्यमंत्र्यांचा आरोग्यावर चांगला अभ्यास आहे, जागतिक आरोग्य संघटनेने काही मापदंड घालून दिले आहेत. त्याचे पालन केले पाहिजे, मास्क ही खरी लस आहे. कोरोनामुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) आणि राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) नियमावलींचे पालन करण्याच्या सूचना देतात, सर सलामत तो पगडी पचास, हॉस्पिटलमध्ये गेल्यावर जे भोगावे लागते ना...तेव्हा वाटतं अरेरे ऐकायला हवं होतं, मास्क घालायला हवा होता, मग आधीच ऐका ना, ते मनसेचे नेते आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलणार? मास्क का वापरत नाहीत याच ठोस विश्लेषण राज ठाकरेंनी करणं गरजेचे आहे अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांनी राज ठाकरेंना टोला लगावला होता.

 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेBala Nandgaonkarबाळा नांदगावकरAyodhyaअयोध्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस