“काही काळेबेरे नसेल तर इतका थयथयाट कशाला?”; भाजपा आमदाराचा थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा

By प्रविण मरगळे | Published: November 24, 2020 05:00 PM2020-11-24T17:00:43+5:302020-11-24T17:02:39+5:30

BJP Atul Bhatkhalkar, CM Uddhav Thackeray: ठाण्यात लागलेल्या आगीच्या झळा मुंबईपर्यंत पोहचतील ही भीती असावी काय? पण चिंता कशाला? कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही असं सांगत आमदार अतुल भातखळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला आहे.

"If there is no blackberry, why so much fuss?"; BJP MLA Atul Bhatkhalkar directly targets CM | “काही काळेबेरे नसेल तर इतका थयथयाट कशाला?”; भाजपा आमदाराचा थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा

“काही काळेबेरे नसेल तर इतका थयथयाट कशाला?”; भाजपा आमदाराचा थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Next
ठळक मुद्देठाकरे सरकारचा काय प्रॉब्लेम आहे? ड्रगवाल्यांवर कारवाई केली तरी यांना त्रास होतोकारवाई काय फक्त सॉफ्टटार्गेट असलेल्या पत्रकार आणि कंगनासारख्या अभिनेत्रीवर व्हावी का?हवालाचे घपले झाले असतील तर सगळा मामला समोर येऊ दे. काही काळेबेरे नसेल तर इतका थयथयाट कशाला?

मुंबई – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने धाड टाकली आहे, मात्र ही कारवाई सुडबुद्धीने केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे, सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई ही भाजपाच्या दबावापोटी केली जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणावर सध्या राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

याबाबत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केलंय की, कंगना राणौत आणि अर्णब प्रकरणी पोलीस दलाचा दुरुपयोग करणारे राज्यातील ठाकरे सरकार ईडीच्या कारवाईवर काय म्हणून कोकलते आहे? हवालाचे घपले झाले असतील तर सगळा मामला समोर येऊ दे. काही काळेबेरे नसेल तर इतका थयथयाट कशाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तर ठाकरे सरकारचा काय प्रॉब्लेम आहे? ड्रगवाल्यांवर कारवाई केली तरी यांना त्रास होतो, हवाला आणि काळ पैसा प्रकरणी कारवाई केली तरी खाली वर होतात. मग कारवाई काय फक्त सॉफ्टटार्गेट असलेल्या पत्रकार आणि कंगनासारख्या अभिनेत्रीवर व्हावी का? ठाण्यात लागलेल्या आगीच्या झळा मुंबईपर्यंत पोहचतील ही भीती असावी काय? पण चिंता कशाला? कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही असं सांगत आमदार अतुल भातखळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला आहे.

सरनाईकांवरील कारवाई दुर्दैवी – काँग्रेस

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, ही कारवाई दुर्दैवी आणि आक्षेपार्ह आहे. केंद्रातील भाजप सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असून भाजपाविरोधात  बोलणाऱ्यांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ईडी, सीबीआय, सारख्या केंद्राच्या तपास यंत्रणाचा राजकीय कारणांसाठी वापर करुन विरोधकांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी कारवाई भाजपाशासित राज्यात झाल्याचे दिसत नाही असंही त्यांनी नमूद केले.

आम्हाला कोणाच्या बापाला घाबरत नाही; संजय राऊत आक्रमक

कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. तुम्ही सुरुवात केली असेत तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. आमच्या मंत्री, आमदारांच्या घराबाहेर ईडीनं कार्यालयं थाटली, तरीही आम्ही घाबरत नाही. ईडी एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणं काम करतेय, अशी टीका त्यांनी केली.

सरनाईक यांच्यावर कार्यालयावर कारवाई हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. कितीही दबाव आणला तरी महाविकास आाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. सरकारी संस्थांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सुरुवात तुम्ही केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. मात्र अशा कारवाया करून पुढची २५ वर्षे भाजपाचे महाराष्ट्रात सरकार येणार नाही. तसेच सरकारी संस्थांनी राजकीय शाखा असल्यासारखे वागू नये, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला आहे.

सुडापोटी सरनाईक यांच्यावर कारवाई - राष्ट्रवादी

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरुद्ध ईडी सुडापोटी कारवाई करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचा छापा पडल्याचे वृत्त मी पाहिले आहे. सरनाईक हे सातत्याने कंगना आणि अर्णबच्या प्रकरणात महाराष्ट्राच्या बाजूने बोलत होते म्हणूनच त्यांच्यावर ईडी कडून छापा टाकला गेला. विरोधीपक्षातील एखादा नेता जो  व्यक्ती केंद्रसरकारच्या विरोधात जास्त बोलेल त्याला ईडीची भीती दाखवली जात आहे. मी बोललो म्हणून माझ्यावर केसेस दाखल केल्या. पवार साहेब निवडणुकीच्या काळात बोलले तर त्यांना नोटीस पाठवली जात आहे. त्यामुळे सुडापोटी ही कारवाई केली जात असल्याचं भुजबळांनी सांगितले.

Web Title: "If there is no blackberry, why so much fuss?"; BJP MLA Atul Bhatkhalkar directly targets CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.