शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 16:39 IST

PM Modi Maharashtra Vidhan Sabha Elections: हरयाणा विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज हल्ला चढवला. मुस्लिमांमधील जातींचा विषय येतो तेव्हा काँग्रेस नेते तोंडाला कुलूप लावून बसतात, असे मोदी म्हणाले. 

PM Modi Maharashtra Assembly Elections 2024: हरयाणाचे निकाल लागल्यानंतर भाजपाचा आत्मविश्वास बळावला आहे. भाजपा नेते काँग्रेसवर हल्ला चढवताना दिसत असून, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील जनतेला काँग्रेसचा प्रत्येक कट उधळून लावण्याचे आव्हान केले. महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालये आणि इतर कामांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. 

काँग्रेसचे नेते तोंडाला कुलूप लावून बसतात -मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले, "काँग्रेसचा फॉर्म्युला स्पष्ट आहे की, मुस्लिमांना घाबरवायचे, त्यांना भीती दाखवायची. त्याचे रुपांतर व्होटबँकेत करायचं. ती मजबूत करायची. काँग्रेसच्या एकाही नेत्यांने आजपर्यंत कधीही विचारलं नाही की, आपल्या मुस्लीम भाऊ-बहि‍णींमध्ये किती जाती असतात? मुस्लिमांमधील जातींचा विषय येताच काँग्रेस नेते तोंडाला कुलूप लावून बसतात; पण जेव्हा हिंदूंचा विषय येतो. तेव्हा काँग्रेस ही चर्चा जातींपासूनच सुरू करते." 

"हिंदू समाजातील एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवत ठेवायचं, ही काँग्रेसचे धोरण आहे. काँग्रेसला माहितीये की, जितकी हिंदूमध्ये फूट पडले, तितकाच त्यांना फायदा होईल. हिंदू समाजात आग भडकत राहावी, असे काँग्रेसला वाटत राहते. कारण त्यावर राजकीय भाकऱ्या भाजता येतील. भारतात जिथे कुठे निवडणुका होतात, तिथे काँग्रेस हा फॉर्म्युला अंवलंबते", अशी टीका मोदींनी केली.  

हिंदू समाजात फूट पाडण्याचा काँग्रेसचा फॉर्म्युला, मोदी काय म्हणाले?

"आपली व्होटबँक मजबूत करण्यासाठी काँग्रेस समाजात द्वेष पसरवण्यासाठी अनेक गोष्टी करत आहे. हिंदू समाजात फूट पाडून त्याला विजयाचा फॉर्म्युला बनवणे, हेच काँग्रेसच्या राजकारणाचा आधार आहे. काँग्रेस भारताच्या सर्वजण हिताय, सर्वजण सुखायला नख लावत आहे", अशी घणाघाती हल्ला मोदींनी काँग्रेसवर केला. 

"महात्मा गांधी म्हणाले होते की, काँग्रेसचं विसर्जन करायला हवे. पण, काँग्रेस स्वतः संपली नाही; आज देशाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आपाल्याला सतर्क राहायचं आहे. मला विश्वास आहे की, समाजाला तोडण्याचे जे प्रयत्न आज होत आहेत, असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील. महाराष्ट्रातील लोकांनी देशाच्या विकासाला सर्वोच्च स्थानी ठेवून भाजपा महायुतीला मतदान करावं. हरयाणा तर भाजपा जिंकली, आता महाराष्ट्रात यापेक्षा मोठा विजय मिळवायचा आहे", असे आवाहन मोदींनी केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी