शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
2
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
3
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
4
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
5
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
6
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
7
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
8
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
9
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
10
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
11
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
12
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
13
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
14
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
15
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
16
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
17
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
18
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
19
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
20
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

coronavirus: "लसीकरणावरून भाजपा नेत्यांची राज्य सरकारवरील टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा’’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 3:52 PM

Corona Vaccination in Maharashtra : लसीकरणावरून भाजपा नेत्यांची राज्य सरकारवरील टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

ठळक मुद्देअत्यंत ढिसाळ आणि नियोजनशून्य मोदी सरकारने लसींचा पुरवठा न केल्याने हा कार्यक्रम देशपातळीवर सुरू होऊ शकणार नाही, ही बाब दुर्दैवी देशातील युवावर्गाची जबाबदारी मोदी सरकारने राज्यांवर ढकलली पण आता लसीकरणातील दिरंगाई ही तरुणाईच्या जीवावर उठणारी आहेभाजपाचे राज्यातील प्रवीण दरेकरांसारखे नेते आणि भाजपा आयटी सेल मात्र राज्य सरकारला दोष देत आहे. तसेच अपप्रचार करत आहे. याला चोराच्या उलट्या बोबा म्हणतात

मुंबई - पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध नसल्याने १ मे पासून सुरू होणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. ( Corona Vaccination) महाराष्ट्रातही लसींच्या टंचाईमुळे १ मेपासून लगेच लसीकरण होणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आधीच स्पष्ट केले होते. दरम्यान, कोरोना लसीकरणावरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्या राज्यातील भाजपा नेत्यांना काँग्रेसने जोरदार टोला लगावला आहे. लसीकरणावरून भाजपा नेत्यांची राज्य सरकारवरील टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. (Congress Spock person Sachin Sawant Criticize Maharashtra BJP leader on issue Of Corona Vaccination)

लसीकरणावरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांवर सचिन सावंत यांनी ट्विट करून निशाणा साधला आहे. त्यात ते म्हणतात की, एक मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. परंतु अत्यंत ढिसाळ आणि नियोजनशून्य मोदी सरकारने लसींचा पुरवठा न केल्याने हा कार्यक्रम देशपातळीवर सुरू होऊ शकणार नाही, ही बाब दुर्दैवी आहे. 

 

जगात लसीकरण युद्धपातळीवर सुरू असताना भाजपाचे राज्यातील प्रवीण दरेकरांसारखे नेते आणि भाजपा आयटी सेल मात्र राज्य सरकारला दोष देत आहे. तसेच अपप्रचार करत आहे. याला चोराच्या उलट्या बोबा म्हणतात. देशातील युवावर्गाची जबाबदारी मोदी सरकारने राज्यांवर ढकलली पण आता लसीकरणातील दिरंगाई ही तरुणाईच्या जीवावर उठणारी आहे, असेही सचिन सावंत म्हणाले. 

तसेच लसीकरणातील ही दिरंगाई केवळ १८ ते ४४ या वयोगटातच नाही. ४५ वर्षांवरील वयोगटातील लसीकरणही केंद्राने लसींचा पुरवठा नीट न केल्याने सातत्याने अडचणीत येत आहे. महाराष्ट्राला जाहीर केलेल्या ४३५०००  रेमडेसीवीरपैकी केवळ २,३०,००० इंजेक्शन पाठवले. मोदी सरकार दिलेले शब्द पाळत नसेल तर राज्यांनी नियोजन कसे करावे? असा सवालही सचिन सावंत यांनी विचारला आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSachin sawantसचिन सावंतcongressकाँग्रेसBJPभाजपा