शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
3
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
4
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
5
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
6
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
7
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
8
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
9
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
10
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
11
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
12
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
13
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
14
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
15
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
16
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
17
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
18
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
19
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
20
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!

'नरेंद्र मोदी, नितीश कुमार आले की पकोडे खायला घाला', राहुल गांधींचा निशाणा

By ravalnath.patil | Published: October 28, 2020 3:56 PM

bihar elections : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.

ठळक मुद्देराहुल गांधी यांनी रोजगारापासून ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

चंपारण : बिहार विधानसभा निवडणुसाठी आज पहिल्या टप्पात मतदान होत आहे. यातच दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकींसाठी प्रचार सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, स्टार प्रचारक म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. राहुल गांधी यांनी पश्चिम चंपारणमध्ये मोर्चा काढून महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर राहुल गांधींनी निशाणा साधला.

एनडीएच्या नेत्यांवर खोटे बोलण्याचा आरोप करत आमच्यात अशी एक कमी आहे की, आम्ही खोटे बोलून त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. यावेळी रॅलीत स्टेजच्या समोर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने पकोडे तळण्याविषयी त्यांना आठवण करून दिली. यावर राहुल गांधी यांनी आपले भाषण थांबवले आणि तुम्ही पकोडे बनविले आहेत का? असा सवाल त्या व्यक्तीला केला. तसेच, नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार पुढील वेळी आले की त्यांना पकोडे खायला घाला, असे राहुल गांधींनी सांगितले.

याआधी राहुल गांधी यांनी रोजगारापासून ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, लॉकडाऊन दरम्यान कामगारांच्या परिस्थितीवरूनही सरकारला घेरले. नरेंद्र मोदींनी कामगारांना पायी चालवले आहे, राहुल गांधी म्हणाले. तसेच, कृषी कायद्याला शेतकऱ्यांच्या विरोधाचा संदर्भ देताना राहुल गांधी म्हणाले की, पंजाबमध्ये दसर्‍यानिमित्त रावणाच्या जागी पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळण्यात आला आहे. हे पाहून मला वाईट वाटले, कारण पंतप्रधानांचा पुतळा असा जाळू नये. मात्र, शेतकऱ्यांनी दु: खी असल्यामुळे असे केले." 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमार