शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

"जोपर्यंत भाजप आहे, तोपर्यंत...", राहुल गांधींच्या विधानानंतर अमित शाहांची संतप्त पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 12:02 IST

Amit Shah on Rahul Gandhi : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबद्दल केलेल्या विधानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मौन सोडले. राहुल गांधी यांचे विचार फूट पाडण्याचे आहेत, असे म्हणत शाहांनी हल्ला चढवला.

Amit Shah Rahul Gandhi Reservation : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा अमेरिका दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. राहुल गांधी यांनी आरएसएस नंतर आरक्षण धोरणाबद्दल एक भाष्य केले. त्यानी केलेल्या विधानाचे पडसाद भारताच्या राजकारणात उमटले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही यावर भूमिका मांडत राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला आहे.

अमित शाहांची पोस्ट, राहुल गांधींच्या विधानावर काय म्हणाले?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात केलेल्या विधानांबद्दल भाष्य करण्यात आले आहे.

अमित शाह म्हणतात, "देशाविरोधात बोलणे आणि देशाचे तुकडे करणाऱ्या शक्तींसोबत उभे राहणे ही राहुल गांधी आणि काँग्रेसची सवय झाली आहे. मग ते जम्मू काश्मीरमध्ये JNKC च्या देशविरोधी आणि आरक्षण विरोधी अजेंड्याचे समर्थन करणे असो, वा परदेशातील व्यासपीठांवर भारताविरोधात बोलणे. राहुल गांधींनी नेहमी भारताच्या सुरक्षेला आणि भावनांना ठेच पोहोचवली आहे."

राहुल गांधींनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा समोर आणला -अमित शाह

अमित शाह पुढे म्हणतात, "भाषा-भाषांमध्ये, प्रांता-प्रांतामध्ये आणि धर्मा-धर्मात भेदभाव निर्माण करण्याबद्दल बोलणे, यातून राहुल गांधी यांचे फूट पाडण्याचेच विचार दिसतात.राहुल गांधींनी देशातून आरक्षण संपवण्याची भाषा करून काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आणण्याचे काम केले आहे. मनातील गोष्टी आणि विचार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर येतच असतात."

"मी राहुल गांधींना सांगू इच्छितो की, जोपर्यंत भाजप आहे, आरक्षणाला कुणीही धक्का लावू शकत नाही आणि देशाच्या एकतेसोबत छेडछाड करू शकत नाही", असे शाह यांनी राहुल गांधी यांच्या आरक्षणाबद्दल केलेल्या विधानावर म्हटले आहे. 

राहुल गांधी आरक्षणाबद्दल अमेरिकेत काय बोलले?

अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी यांनी आरक्षणाबद्दल भूमिका मांडली होती. "योग्य वेळ आल्यावर काँग्रेस आरक्षण संपवण्याबद्दल विचार करेन. जेव्हा देशात सर्वांना समान संधी मिळू लागतील. पण, सध्या भारतात अशी परिस्थिती नाही. जेव्हा तुम्ही आर्थिक आकडे बघता, तेव्हा आदिवासींना १०० रुपयातून १० पैसे मिळत आहेत. दलितांना १०० रुपयातून ५ रुपये मिळतात आणि ओबीसींनाही इतके पैसे मिळतात. भारतातील बिझनेस लिडर्सची जर यादी बघितली, तर मला वाटते टॉप २०० मध्ये एक ओबीसी आहे. खरंतर त्यांची संख्या भारतात ५० टक्के आहे. पण, आम्ही या आजारावर उपचार करत नाहीये", असे राहुल गांधी म्हणालेले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाreservationआरक्षणElectionनिवडणूक 2024