शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"जोपर्यंत भाजप आहे, तोपर्यंत...", राहुल गांधींच्या विधानानंतर अमित शाहांची संतप्त पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 12:02 IST

Amit Shah on Rahul Gandhi : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबद्दल केलेल्या विधानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मौन सोडले. राहुल गांधी यांचे विचार फूट पाडण्याचे आहेत, असे म्हणत शाहांनी हल्ला चढवला.

Amit Shah Rahul Gandhi Reservation : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा अमेरिका दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. राहुल गांधी यांनी आरएसएस नंतर आरक्षण धोरणाबद्दल एक भाष्य केले. त्यानी केलेल्या विधानाचे पडसाद भारताच्या राजकारणात उमटले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही यावर भूमिका मांडत राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला आहे.

अमित शाहांची पोस्ट, राहुल गांधींच्या विधानावर काय म्हणाले?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात केलेल्या विधानांबद्दल भाष्य करण्यात आले आहे.

अमित शाह म्हणतात, "देशाविरोधात बोलणे आणि देशाचे तुकडे करणाऱ्या शक्तींसोबत उभे राहणे ही राहुल गांधी आणि काँग्रेसची सवय झाली आहे. मग ते जम्मू काश्मीरमध्ये JNKC च्या देशविरोधी आणि आरक्षण विरोधी अजेंड्याचे समर्थन करणे असो, वा परदेशातील व्यासपीठांवर भारताविरोधात बोलणे. राहुल गांधींनी नेहमी भारताच्या सुरक्षेला आणि भावनांना ठेच पोहोचवली आहे."

राहुल गांधींनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा समोर आणला -अमित शाह

अमित शाह पुढे म्हणतात, "भाषा-भाषांमध्ये, प्रांता-प्रांतामध्ये आणि धर्मा-धर्मात भेदभाव निर्माण करण्याबद्दल बोलणे, यातून राहुल गांधी यांचे फूट पाडण्याचेच विचार दिसतात.राहुल गांधींनी देशातून आरक्षण संपवण्याची भाषा करून काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आणण्याचे काम केले आहे. मनातील गोष्टी आणि विचार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर येतच असतात."

"मी राहुल गांधींना सांगू इच्छितो की, जोपर्यंत भाजप आहे, आरक्षणाला कुणीही धक्का लावू शकत नाही आणि देशाच्या एकतेसोबत छेडछाड करू शकत नाही", असे शाह यांनी राहुल गांधी यांच्या आरक्षणाबद्दल केलेल्या विधानावर म्हटले आहे. 

राहुल गांधी आरक्षणाबद्दल अमेरिकेत काय बोलले?

अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी यांनी आरक्षणाबद्दल भूमिका मांडली होती. "योग्य वेळ आल्यावर काँग्रेस आरक्षण संपवण्याबद्दल विचार करेन. जेव्हा देशात सर्वांना समान संधी मिळू लागतील. पण, सध्या भारतात अशी परिस्थिती नाही. जेव्हा तुम्ही आर्थिक आकडे बघता, तेव्हा आदिवासींना १०० रुपयातून १० पैसे मिळत आहेत. दलितांना १०० रुपयातून ५ रुपये मिळतात आणि ओबीसींनाही इतके पैसे मिळतात. भारतातील बिझनेस लिडर्सची जर यादी बघितली, तर मला वाटते टॉप २०० मध्ये एक ओबीसी आहे. खरंतर त्यांची संख्या भारतात ५० टक्के आहे. पण, आम्ही या आजारावर उपचार करत नाहीये", असे राहुल गांधी म्हणालेले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाreservationआरक्षणElectionनिवडणूक 2024