शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

पिंपरी चिंचवड शहराची वाढली लोकसंख्या, पाणी आरक्षण वाढणार कधी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 2:11 PM

भामा आसखेड आणि पवना बंदिस्त जलवाहिनी योजना आणि चोवीस तास पाणी योजनाही कागदावरच आहे..   

ठळक मुद्देपवना धरणातून शहराला दिवसाला ४८० एमएलडी पाणी आरक्षण

विश्वास मोरे - पिंपरी : देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर म्हणजेच पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी असून, पंचवीस वर्षांत शहर जेवढे वाढले त्या तुलनेत पाणीआरक्षण वाढलेले नाही. परिणामी, अपुऱ्या पाणीपुरवठ्यास नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. भामा आसखेड आणि पवना बंदिस्त जलवाहिनी योजना आणि चोवीस तास पाणी योजनाही कागदावरच आहे.   मावळातील पवना धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत पाणी सोडलेले पाणी रावेत येथे आल्यानंतर तेथील बंधाऱ्यातून पाणी उचलून निगडी प्राधिकरणातील जलशुद्धिकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. त्यानंतर शहरातील टाक्यांमध्ये नेले जाते. तेथून शहरभर जलवाहिनीद्वारे नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पुरविले जाते. पवना धरणातून शहराला दिवसाला ४८० एमएलडी पाणी आरक्षण मिळाले आहे.  मात्र, लोकसंख्या वाढीचा आलेख पाहता, पाणी आरक्षणात बदल झालेला नाही. 

योजनाना गती द्यायला हवीपवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प दहा वर्षांपासून ठप्प आहेत. तर भामा आसखेड आणि आंद्रा धरणातून पाणी आणण्याची योजनाही कागदावरच आहे. परिणामी कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा याचा त्रास नागरिकांना आणि शहराला होत आहे. आवश्यकता ११० एमएलडीची राष्ट्रीय निर्देशांकानुसार प्रतिमाणसी दरडोई पाणी दिवसाला १३५ लिटर आवश्यक आहे. महापालिकेचे पाणी नियोजनाकडे दुर्लक्ष होत असून, औद्योगिकनगरीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ........पंचवीस वर्षांत बावीस लाख लोकसंख्यागेल्या पंचवीस वर्षांत औद्योगिकनगरीची लोकसंख्या २२ लाखांवर गेली आहे.  दिवसेदिवस लोकसंख्येत वाढच होत आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वाढलेले नाही. त्यामुळे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सत्ताधारी आणि प्रशासनाचे पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष होत आहे. औद्योगिकनगरीची लोकसंख्या वाढली पाणी आरक्षण कधी वाढणार, असा प्रश्न आहे..............तीस एमएलडी पाण्याची तूट गेल्या पाच वर्षांत पाच पट लोकसंख्या वाढली आहे. पाच वर्षांत १ लाख २९ हजार ५२५ एवढी कुटुंबे आणि लोकसंख्या  ९ लाख ४९ हजार ६७५  ने वाढली आहे. त्यामुळे नवीन लोकसंख्या वाढीचा आलेख पाहता, प्रतिमाणसी १३५ याप्रमाणे आता वाढलेल्या लोकसंख्येला ११० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. सध्या तूट ही तीस एमएलडीची आहे. त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी तूट वाढत असताना आरक्षण वाढण्याची गरज आहे. पर्यायी पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्याची गरज आहे. पाणी आरक्षण वाढवून मिळावे, यासाठी जलसंपदा मंत्र्यांशी पत्रव्यवहार केला आहे. भामा आसखेड, आंध्रा धरणातून पाणी आणण्याच्या योजनांना गती देण्याचे काम सुरू आहे. नवीन योजना झाल्यास शंभर एमएलडी पाणी मिळणार आहे. त्यानंतर इंद्रायणी नदीतून पाणी उचलल्यास शंभर एमएलडी पाणी मिळणार आहे. त्यातून समाविष्ट गावांचा तहान भागविली जाणार आहे. पवनातून येणारे पाणी उर्वरित भागाला पुरविले जाईल. - राहुल जाधव, महापौर .......लोकसंख्येत वाढ होत असताना पाणी आरक्षण वाढलेले नाही. त्यामुळे पाणीप्रश्नाला समोरे जावे लागत आहे. पाण्याच्या तक्रारी कमी करण्याचा प्रयत्न असणार आहे. भामा आसखेड, आंध्रा धरणातून पाणी आणण्याच्या योजनांना गती दिल्यास पाणी प्रश्न सुटू शकणार आहे. दिवसाआड पाण्याची सायकल आपण नियमित केल्यानंतर काही भागात पाण्याच्या तक्रारी होत्या. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. - मकरंद निकम, सहशहर अभियंता...देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर म्हणजेच पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी असून पंचवीस वर्षांत शहर जेवढे वाढले त्या तुलनेत पाणी आरक्षण वाढलेले नाही. परिणामी अपूºया पाणीपुरवठ्यास नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. ....वर्ष                    पाणी                   वाढलेली                         आरक्षण                 लोकसंख्या२०१४-१५       ४७२ एमएलडी         १,२९, ५२५२०१५-१६     ४७० एमएलडी          १,१३, ५८०२० १६-१७     ४५० एमएलडी          १,१६, ९२५२०१७-१८     ५०६ एमएलडी          १,२९, ५२५२०१८-१९     ४८० एमएलडी         १,८०,२३५२०१९-२०     ४८० एमएलडी          ८०,४७५  एकूण                                     ९ लाख ४९ हजार ६७५

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीPavna Nagarपवना नगरDamधरणreservationआरक्षण