शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

Pimpri Chinchwad: '२ छोट्या मुलांना घेऊन मध्यरात्री बाहेर पडायचं…' दरवर्षी हाच अनुभव, पुरग्रस्तांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 12:31 IST

महापालिकेने गतवर्षी तात्पुरत्या स्वरूपातील पूरनियंत्रण उपाययोजना केल्या होत्या. मात्र, त्याचा परिणाम फारसा न दिसल्याने यंदा नागरिकांकडून ‘तात्पुरत्या नव्हे, तर कायमस्वरूपी उपाय करा अशी मागणी होत आहे

पिंपरी : ‘दोन छोट्या मुलांना घेऊन मध्यरात्री बाहेर पडायचं…दरवर्षी हा अनुभव. आता थकलो आहोत. महापालिकेने आम्हाला कायमचा दिलासा द्यावा. दरवर्षी खर्च सांभाळायचा की जागा बदलायची, हेच कळेनासं झालंय…इतक्या वर्षांनंतरसुद्धा आज आमच्या आरोग्याचा, सुरक्षेचा विचार कोणी करत नाही का?,’ अशा शब्दांत पूरग्रस्त नागरिकांनी ‘लोकमत’कडे आपली खंत व्यक्त केली.

पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांना पूर आला की, या नद्यांच्या काठावरील वस्त्यांमध्ये दरवर्षी पाणी शिरते. त्यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांचे जगणे असह्य बनले आहे. विशेष म्हणजे, सलग दोन ते तीन दिवस जोरदार पाऊस पडला, तरी महापालिकेला या परिसरातील नागरिकांचे मध्यरात्री स्थलांतर करावे लागते.

तात्पुरता नको, कायमस्वरूपी उपाय करा...

मागील तीन वर्षांत सुमारे १२ वेळा स्थलांतर केले आहेत. यातील वृद्ध व महिलांना स्थलांतराच्या काळात सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. महापालिकेने गतवर्षी तात्पुरत्या स्वरूपातील पूरनियंत्रण उपाययोजना केल्या होत्या. मात्र, त्याचा परिणाम फारसा न दिसल्याने यंदा नागरिकांकडून ‘तात्पुरत्या नव्हे, तर कायमस्वरूपी उपाय करा,’ अशी मागणी नागरिक करीत आहेत.

या भागात शिरले पाणी...

पिंपरी-चिंचवड शहरातील नदीपात्रापासून जवळ असणाऱ्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील भाटनगर परिसर, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील लेबर कॅम्प, किवळे, केशवनगर, जाधव घाट, काळेवाडी, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पिंपळे निलख पंचशीलनगर, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील रामनगर बोपखेल, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील संजय गांधी नगर, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पिंपळे गुरव लक्ष्मीनगर या भागात पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या भागावर लक्ष केंद्रित केले आहे.

इतरांनी बेकायदेशीर बांधकामे केली, नाल्यांवर अतिक्रमणे केली आणि शिक्षा मात्र आमच्या नशिबी येते! यावर कधी तरी कायमस्वरूपी तोडगा निघणार का, की आम्ही दरवर्षी पावसाळ्यात स्थलांतरच करत राहायचं का?- सारिका जाधव, पूरग्रस्त

पवना नदीतील भराव टाकून केलेली अनधिकृत बांधकामे, वळवलेले नाले यामुळे थोडा जरी पाऊस आला की घरात पाणी शिरत आहे. यावर फक्त कारवाई करण्याचे फक्त आश्वासन महापालिका देते. मात्र, यावर कारवाई कधी होतच नाही.- विशाल चव्हाण, पूरग्रस्त

आम्ही जन्मापासून या ठिकाणी राहत आहोत. याआधी कितीही पाऊस पडला तरीही पूर येत नव्हता; मात्र गेल्या काही वर्षांत थोडा पाऊस पडला तरीही लगेच नदीला पूर येतो. आता आमची घरे निळ्या पूररेषेत असल्याची सांगितली जात आहे. आमची घरे गेली तीस-पस्तीस वर्षे झाली आहेत. निळी पूररेषा नंतर आली. यावर प्रशासनाने तोडगा काढावा.- सुनंदा पाटील, पूरग्रस्त

महापालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा

पिंपरी चिंचवडमधील पूरस्थिती नियंत्रणात असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. महापालिका प्रशासन अत्यंत सज्ज आहे आणि पोखरलेल्या भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करून सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असल्यास कृपया महापालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीfloodपूरHomeसुंदर गृहनियोजनMuncipal Corporationनगर पालिकाGovernmentसरकारNatureनिसर्ग