शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
5
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
6
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
7
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
8
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
9
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
10
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
11
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
12
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
13
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
14
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
15
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
16
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
17
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
18
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
19
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
20
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग

Pimpri Chinchwad: '२ छोट्या मुलांना घेऊन मध्यरात्री बाहेर पडायचं…' दरवर्षी हाच अनुभव, पुरग्रस्तांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 12:31 IST

महापालिकेने गतवर्षी तात्पुरत्या स्वरूपातील पूरनियंत्रण उपाययोजना केल्या होत्या. मात्र, त्याचा परिणाम फारसा न दिसल्याने यंदा नागरिकांकडून ‘तात्पुरत्या नव्हे, तर कायमस्वरूपी उपाय करा अशी मागणी होत आहे

पिंपरी : ‘दोन छोट्या मुलांना घेऊन मध्यरात्री बाहेर पडायचं…दरवर्षी हा अनुभव. आता थकलो आहोत. महापालिकेने आम्हाला कायमचा दिलासा द्यावा. दरवर्षी खर्च सांभाळायचा की जागा बदलायची, हेच कळेनासं झालंय…इतक्या वर्षांनंतरसुद्धा आज आमच्या आरोग्याचा, सुरक्षेचा विचार कोणी करत नाही का?,’ अशा शब्दांत पूरग्रस्त नागरिकांनी ‘लोकमत’कडे आपली खंत व्यक्त केली.

पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांना पूर आला की, या नद्यांच्या काठावरील वस्त्यांमध्ये दरवर्षी पाणी शिरते. त्यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांचे जगणे असह्य बनले आहे. विशेष म्हणजे, सलग दोन ते तीन दिवस जोरदार पाऊस पडला, तरी महापालिकेला या परिसरातील नागरिकांचे मध्यरात्री स्थलांतर करावे लागते.

तात्पुरता नको, कायमस्वरूपी उपाय करा...

मागील तीन वर्षांत सुमारे १२ वेळा स्थलांतर केले आहेत. यातील वृद्ध व महिलांना स्थलांतराच्या काळात सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. महापालिकेने गतवर्षी तात्पुरत्या स्वरूपातील पूरनियंत्रण उपाययोजना केल्या होत्या. मात्र, त्याचा परिणाम फारसा न दिसल्याने यंदा नागरिकांकडून ‘तात्पुरत्या नव्हे, तर कायमस्वरूपी उपाय करा,’ अशी मागणी नागरिक करीत आहेत.

या भागात शिरले पाणी...

पिंपरी-चिंचवड शहरातील नदीपात्रापासून जवळ असणाऱ्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील भाटनगर परिसर, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील लेबर कॅम्प, किवळे, केशवनगर, जाधव घाट, काळेवाडी, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पिंपळे निलख पंचशीलनगर, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील रामनगर बोपखेल, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील संजय गांधी नगर, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पिंपळे गुरव लक्ष्मीनगर या भागात पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या भागावर लक्ष केंद्रित केले आहे.

इतरांनी बेकायदेशीर बांधकामे केली, नाल्यांवर अतिक्रमणे केली आणि शिक्षा मात्र आमच्या नशिबी येते! यावर कधी तरी कायमस्वरूपी तोडगा निघणार का, की आम्ही दरवर्षी पावसाळ्यात स्थलांतरच करत राहायचं का?- सारिका जाधव, पूरग्रस्त

पवना नदीतील भराव टाकून केलेली अनधिकृत बांधकामे, वळवलेले नाले यामुळे थोडा जरी पाऊस आला की घरात पाणी शिरत आहे. यावर फक्त कारवाई करण्याचे फक्त आश्वासन महापालिका देते. मात्र, यावर कारवाई कधी होतच नाही.- विशाल चव्हाण, पूरग्रस्त

आम्ही जन्मापासून या ठिकाणी राहत आहोत. याआधी कितीही पाऊस पडला तरीही पूर येत नव्हता; मात्र गेल्या काही वर्षांत थोडा पाऊस पडला तरीही लगेच नदीला पूर येतो. आता आमची घरे निळ्या पूररेषेत असल्याची सांगितली जात आहे. आमची घरे गेली तीस-पस्तीस वर्षे झाली आहेत. निळी पूररेषा नंतर आली. यावर प्रशासनाने तोडगा काढावा.- सुनंदा पाटील, पूरग्रस्त

महापालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा

पिंपरी चिंचवडमधील पूरस्थिती नियंत्रणात असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. महापालिका प्रशासन अत्यंत सज्ज आहे आणि पोखरलेल्या भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करून सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असल्यास कृपया महापालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीfloodपूरHomeसुंदर गृहनियोजनMuncipal Corporationनगर पालिकाGovernmentसरकारNatureनिसर्ग