शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

खरीपपूर्व पेरणीची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2015 05:06 IST

खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मॉन्सूनपूर्व वरुणराजाच्या आगमनाने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या वाहतुकीस जोरात सुरुवात केली आहे.

शेलपिंपळगाव : खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मॉन्सूनपूर्व वरुणराजाच्या आगमनाने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या वाहतुकीस जोरात सुरुवात केली आहे. मृग नक्षत्र सुरु झाल्याने पावसाचा अंदाज बांधून बळीराजाने खरीप हंगामाची जय्यत तयारीही सुरु आहे. शेतक-यांनी पेरणीपूर्व शेतीची मशागत सुरु केली आहे. चांगला पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी करावी, असा सल्ला ज्येष्ठ हवामान शास्रज्ञ व कृषी सल्लागार डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे. खेडच्या पूर्व तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या आठवड्यापासून वातावरणात बदल घडून कमालीची उष्णता जाणवत होती. मागील आठवड्याच्या गुरुवारपासून पावसासारखी परिस्थिती निर्माण होऊन जमिनीवर हलक्या सरी येत होत्या. मात्र, त्यानंतर पश्चिमेकडून पूर्वेकडे मोठ्या प्रमाणात मान्सूनसारखे ढग वाहू लागले आहे. हवामान उष्ण असल्याने सलग दोन-तीन दिवस पावसाच्या सरी कोसळत आहेत. मागील दोन्हीही दिवस विजेच्या कडकडटसह मान्सूनपूर्व वळवाच्या पावसाने परिसरात हजेरी लावली आहे.वळवाच्या पावसानंतर शेतीची पेरणीपूर्व मशागत करण्यास अधिक फायदा होत असल्याने हा पाउस अधिक फायद्याचा मानला जात असतो. गेल्या वर्षी मृग नक्षत्र संपूनही पावसाचे आगमन झाले नव्हते. यावर्षीही अशीच परिस्थिती उद्भवते की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला होता. मात्र पावसामुळे खरीप हंगाम वेळेत सुरु होईल, अशी आशा शेतकरी वर्गात दिसून येत आहे.वळवाच्या सरी कोसळल्यानंतर दिवसभर बळीराजाने शेतीची मशागत करण्यास सुरुवात केली आहे. पेरणीपूर्व खतावणी टाकून बैलांच्या किवा ट्रकरच्या साह्याने जमीन पेरणीलायक करण्यास शेतकरी मग्न झाला आहे. मुंबईकडेही आज सकाळी झालेल्या पावसामुळे या भागातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यानुसार आज सकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत आहे. आकाशात पाणीदार ढगांची वर्दळ असल्याने हवेत गारवा निर्माण होऊन मान्सून पावसाची रिपरिप लवकरच सुरु होईल, अशी आशा शेतकरी बाळगून आहे. खरीपातील पिकांच्या पेरणीसाठी चांगल्या मोठ्या पावसाची अपेक्षा शेतकरी करत आहे. (वार्ताहर)