Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 14:23 IST2025-06-09T13:56:40+5:302025-06-09T14:23:33+5:30

Raja Raghuvanshi : राजा रघुवंशीचा मृतदेह २ जून रोजी सापडला. यानंतर मोठा गोंधळ उडाला, या प्रकरणाचा गुंता अखेर सुटला आहे.

Raja Raghuvanshi : मध्य प्रदेश येथील राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम रघुवंशी हनिमुनसाठी मेघालयला गेले होते. यानंतर ते अचानक बेपत्ता झाले. २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला. या मृत्यूचे गुढ वाढले होते. सोनमही बेपत्ता होती. दरम्यान, आता राजा रघुवंशीची हत्या सोनमनेच केल्याचे पोलीस तपासातून समोर आले. पोलिसांनी सोनमसह तिघांना अटक केली आहे. तर, एक फरार आहे.

इंदूर दाम्पत्याच्या प्रकरणात सोनम रघुवंशीला अटक झाल्यानंतर एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोनम राजा रघुवंशीसोबतच्या तिच्या लग्नावर खूश नव्हती. तिचे राज कुशवाह नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते, म्हणूनच तिने राजाची हत्या करण्याचा कट रचला होता.

गेल्या काही दिवसापासून सोनमचा शोध सुरू होता. आता सोनमला उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील एका ढाब्यातून अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे, दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. अटक केलेल्यांमध्ये राज कुशवाहाचाही समावेश आहे.

दरम्यान, राजा रघुवंशीच्या आईने एक मोठा खुलासा केला आहे. लग्नापूर्वीच राजा याला सोनम या लग्नासाठी खूश नसल्याचे समजले होते. ही गोष्ट त्याने त्याच्या आईला सांगितली होती. त्याने लग्नास नकारही दिला होता.

यानंतर, राजाच्या आईने सोनमशी याबद्दल बोलली होती. यावेळी सोनमने मी ऑफिसच्या कामात आहे असं सांगितलं होतं. यानंतर तिने राजाशी बोलणे सुरू केले. दोघांचे लग्न १ ऑक्टोबर २०२४ रोजी ठरले.

राजाची आई उमा रघुवंशी म्हणाल्या की, शिलाँगला जाण्याचा प्लॅन आधीच बनवलेला नव्हता. सोनमला सुट्टीसाठी जायचे होते पण राजा तयार नव्हता. मग तो म्हणाला, सोनमने आधीच तिकीट बुक केले आहे, आता मी काय करू शकतो. ती ६-७ दिवसांची ट्रिप होती म्हणून मीही होकार दिला. यामध्ये सोनमने फक्त जाण्याचे तिकिट बुक केले होते येण्याचे तिकिट बुक केले नव्हते.

राजाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, राजा सोनमला चित्रपट पाहण्यासाठी घेऊन जायचा होता. पण त्याच्या आईने नकार दिला आणि म्हटले की आमच्या कुटुंबात असे चालत नाही.

"राजाने एकदा म्हटले होते की सोनम त्याच्याशी फोनवर बोलण्यात रस दाखवत नाही. ती त्याच्याशी बोलत नाही यामुळे तो लग्न करू इच्छित नाही. यानंतर राजाच्या आईने हस्तक्षेप केले होता".