राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 16:06 IST2025-06-08T14:29:12+5:302025-06-08T16:06:52+5:30

इंदूरमधील राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी हे जोडपे हनिमूनसाठी मेघालयला गेले होते, पण ते तिथेच गूढपणे बेपत्ता झाले आहेत.

मध्य प्रदेशातील इंदूर येथील एक जोडपे हनिमूनसाठी मेघालयात गेले होते, पण ते रहस्यमय पद्धतीने बेपत्ता झाले आहेत. ज्या स्कूटरवरुन हे जोडपे आले होते. ती स्कूटरही बेवारस पद्धतीने आढळली. पती राजा रघुवंशी यांचा मृतदेह दरीत आढळला आहे.

हे जोडप इंदूरचं आहे. राजा आणि सोनम यांचा विवाह काही महिन्यांपूर्वी झाला होता. त्या दोघांनीही लग्नानंतर मेघालयला जायचे ठरवले होते.

२१ मे रोजी सोनम आणि राजा मेघालयाची राजधानी शिलाँगला पोहोचले आणि संध्याकाळी ६ वाजता बालाडी गेस्ट हाऊसमध्ये गेले. हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर, त्यांनी विश्रांती घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कीटिंग रोडला गेले.

येथून त्यांनी एक स्कूटी भाड्याने घेतली आणि नंतर गेस्ट हाऊसमध्ये परतले. यावेळी ते जोडपे त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांचे सामान काढून चेक आउट केले. राजा यांनी हॉटेल मॅनेजरला सांगितले की, आम्ही ३ दिवसांनी परत येणार असेल तर आम्ही कॉल करेल.

शिलाँगहून निघाल्यानंतर, हे जोडपे पूर्व खासी हिल्समधील मावलाखियात गावात पोहोचले. येथे त्यांनी त्यांची स्कूटी एका पार्किंगमध्ये पार्क केली. त्यांना शिप्रा होमस्टेला जायचे होते, तिथे त्यांना ट्रेकिंग करून जावे लागले. त्यांनी एका स्थानिक व्यक्तीला मार्गदर्शक म्हणून सोबत घेतले होते.

शिपारा होमस्टे येथे पोहोचल्यानंतर, त्या जोडप्याने तिथेच राहून रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे २३ मे रोजी मार्गदर्शकाशिवाय मावळाखियातला परतले. तेव्हापासून त्यांचा कोणताही पत्ता लागला नाही. त्यांचा तेव्हापासूनच कुटुंबीयांसोबत संपर्क तुटला. त्यावेळी कुटुंबीयांनी पोलिसांत संपर्क साधला.

२४ मे रोजी पोलिसांना सोहरारीम गावात एक बेवारस स्कूटी मिळाल्याची माहिती मिळाली. सोनम आणि राजा यांनी ती स्कूटी भाड्याने घेतली होती. २५ मे नंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली, पण अजूनही काही सापडले नाही.

पोलिसांनी या कामात ड्रोनचा वापरही सुरू केला. २ जून रोजी वेई सोडोंग फॉल्सच्या खाली असलेल्या दरीत एक मृतदेह आढळला. मृतदेह कुजला होता. पोलिस तपासात तो राजा रघुवंशी यांचा मृतदेह असल्याचे समोर आले. त्यानंतर सोनम रघुवंशीचा शोध सुरू करण्यात आला.

आज, ८ जूनपर्यंत, सोनम रघुवंशीचा कोणताही पत्ता लागलेला नाही. सोनम रघुवंशीचे अपहरण करून बांगलादेशला नेण्यात आले असाव, असा संशय आहे. मेघालय आणि बांगलादेशमध्ये एक सीमा आहे, त्या ठिकाणी कुंपण नाही.पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.