हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:16 IST2025-06-18T15:00:50+5:302025-06-18T15:16:18+5:30

हनीमूनला जाताना सोनमने काय काय नेले होते? असा प्रश्न केला असता, गोविंद म्हणाला...

राजा रघुवंशी हत्याकांडाने संपूर्ण देशभरात खळभळ उडवून दिली आहे. यासंदर्भात सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत. यातच आता हत्याकांडातील आरोकी सोनम हिचा भाऊ गोविंद याने, राजाच्या कुटुंबाला आपल्यावर शंका असेल, तर ते चौकशीची मागणी करू शकतात. आपण नार्को टेस्टसाठीही तयार आहोत.

गोविंद यापूर्वीही राजाच्या घरी जाऊन त्यांच्या दुःखात सहभागी झाला होता. महत्वाचे म्हणजे, हनीमूनला जाताना सोनम आपल्यासोबत किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती, हेही सांगितले.

गोविंद पुढे म्हणाला, 'जेवढे सत्य होते तेवढे आम्ही माध्यमे आणि त्यांना सांगितले आहे. मात्र, तरीही त्यांना आमच्यावर संश असेल तर ते चौकशी करू शकता. मी त्यांच्या घरीही गेलो आहे. त्यांच्या घराव मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे, हे आपल्याला माहीत आहे. यामुळे, जर त्यांची नार्को टेस्टची मागणी असे, तर करू शकता.

एएनआयसोबत बोलताना गोविंद म्हणाला, 'त्यांनी बोलावले नव्हते. मी राजाच्या तेराव्याच्या कार्यक्रमाला स्वतःच गेलो होतो. मी राजाला मनापासून मानतो. मेघालय पोलीस आल्याचे समजते. मला जबाब नोंदवण्यासाठी शिलाँग येथे बोलावले आहे. मात्र, कसलेही कंफर्मेशन नाही. पण जेव्हा आवश्यकता भासेल, तेव्हा आपण पहिल्या फ्लाइटने येऊ शकतो, असे मी म्हटले आहे.

आपल्यासोबत काय काय घेऊन गेली सोनम - हनीमूनला जाताना सोनमने काय काय नेले होते? असा प्रश्न केला असता, गोविंद म्हणाला, "काही दागिने नेले होते, जसे की मंगळसूत्र जे पोलिसांनी जप्त केले आहे. बाकी काही कानातील, नाकातील नेले होते. इतर दागिने आमच्याकडेच आहेत."

याशिवाय "कॅशच्या स्वरुपात तिने 10 ते 20 हजार रुपये नेले होते. तिने सोबत दोन मोबाईलही नेले होते. एक मोबाईल तिचा स्वतःचा होता. तर दुसरा ऑफीसचा. तसेच इतर कोणत्याही मुल्यवान वस्तू नेल्या नव्हत्या," असेही गोविंद म्हणाला.

राजाला चेन घालून यायला सांगितले होते - यापूर्वी, सोनमने आपल्या मुलाला सोन्याची चेन घालून यायला सांगितले होते. राजाचा एअरपोर्टवरील फोटो बघितला, तेव्हा त्याच्या गळ्यात सोन्याची चेन होती. हे पाहून मला काळजी वाटली होती, असे राजाची आई उमा रघुवंशी यांनी म्हटले होते.