Corona Virus : बापरे! नवीन लक्षणं घेऊन आला कोरोना; घशामध्ये भयंकर इन्फेक्शनचा सामना करताहेत लोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 11:57 IST2023-04-09T11:42:19+5:302023-04-09T11:57:53+5:30
Corona Virus : शहरात अनेक रुग्ण घसादुखी, संसर्गाच्या तक्रारी घेऊन येत आहेत.

कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यापूर्वीही कोरोनामुळे काही मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र, कोरोनाचा वेग पाहता घाबरण्याची गरज नसून काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.
शहरात अनेक रुग्ण घसादुखी, संसर्गाच्या तक्रारी घेऊन येत आहेत. इतर देशांच्या तुलनेत भारतात काळजी करण्यासारखे काही नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. पुन्हा एकदा मास्क लावण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
कोकिलाबेन अंबानी रुग्णालयातील डॉक्टर तनु सिंह म्हणाले की, याचे एक कारण हे देखील असू शकते की येथे एकाच संख्येत चाचण्या केल्या जात नाहीत. भारतात, ऑगस्ट 2021 मध्ये, एका दिवसात 22 लाख टेस्ट करण्यात आल्या. सध्या हा आकडा एक लाख आहे. तर दुसरीकडे डॉ. राहुल पंडित म्हणाले की, सध्या लोक टेस्ट करत नाहीत.
महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, WHO च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आम्ही एक मिलियन (10 लाख) लोकसंख्येमागे 140 टेस्ट घेतो. तथापि, केंद्र सरकारने सर्व राज्यांना चाचणी वाढविण्यास सांगितले आहे.
विशेषतः RTPCR तंत्राचा अवलंब करून. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, यावेळी कोरोनाचे आकडे एक-दोन दिवसांत दुप्पट होणार नाहीत, परंतु यावेळी प्रकरण वेगळे आहे. यावेळी लोक घशातील गंभीर संसर्गाने पुढे येत आहेत. जो मानवी शरीरात 10 ते 14 दिवस राहतो. सीटी स्कॅन करताना वेगवेगळ्या भागात दिसतो.
कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांदरम्यान, तज्ञांचे म्हणणे आहे की दोन ते तीन आठवड्यांत त्याचा वेग कमी होण्यास सुरुवात होईल. सध्या फक्त कोरोनाचा XBB.1.16 प्रकार वेगाने पसरत आहे. ज्या वेगाने तो पसरत आहे, त्याच वेगाने तो कमी होण्याचीही शक्यता आहे.
दोन ते तीन आठवड्यांत ते कमी होण्यास सुरुवात होईल. एचएन रिलायन्स हॉस्पिटल मुंबईच्या डॉक्टर हेमल शाह सांगतात की अनेकांना संसर्ग होत आहे, पण त्यांना फारसा त्रास होत नाही. असे असूनही आजारी व्यक्तींना वेगळे करून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.
शनिवारी देशात कोरोनाचे 6,155 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 31,194 झाली आहे. देशात आणखी 11 रुग्णांचा संसर्ग झाल्याची बातमी आहे. कोरोनामधून बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.74 टक्के राहिला आहे.
मुंबईत शनिवारी 207 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 14 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 7 रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे. त्याचवेळी राज्यात 542 नवे रुग्ण आढळले आहेत. 1 रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
देशभरात सध्या कोरोना झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा डेली पॉझिटिव्हिटी रेट 5.63 टक्क्यांवर पोहोचला आहे, तर विकली पॉझिटिव्हिटी रेट 3.47 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली.
बैठकीत मनसुख मांडविया यांनी कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राज्यांसह कोविड-19 लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेतला. डॉ. मनसुख मांडविया म्हणाले की, केंद्र आणि राज्यांनी सहकार्याच्या भावनेने काम करण्याची गरज आहे.
बैठकीत राज्यांना 10 आणि 11 एप्रिल रोजी सर्व आरोग्य केंद्रांवर मॉक ड्रिल घेण्यास सांगण्यात आले आहे. मॉक ड्रीलचा आढावा घेण्यासाठी केंद्राच्या वतीने राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना स्वत: रुग्णालयांना भेट देण्यास सांगण्यात आले. देशाची राजधानी दिल्लीत आता कोरोना जीवघेणा ठरत आहे.