शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाचे महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 5:07 PM

1 / 6
दिवाळीत पहाटे उठून 'अभ्यंगस्नान' केले जाते. शरीराला तेल चोळून, उटणे लावून आंघोळ करण्याची पारंपरिक पद्धत आहे.
2 / 6
आयुर्वेदानुसार या 'अभ्यंगस्नाना'चे विशेष महत्त्व आहे. उटणे, सुगंधी तेल या सगळ्यांचे गुणधर्म लक्षात घेऊन विशिष्ट वेळेला ते वापरावे, असे आयुर्वेदात सांगितले आहे.
3 / 6
नरक चतुर्दशी ते बलिप्रतिपदा हे दीपावलीचे तीनही दिवशी नियमित अभ्यंगस्नान करण्यास सांगितले आहे. नरक चतुर्दशी दिवशी (मांगलिक स्नान) पहाटे लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करण्यास सांगितले आहे.
4 / 6
शरीराला तेल लावून चोळून ते त्वचेत जिरविणे व नंतर ऊनपाण्याने स्नान करणे म्हणजे अभ्यंगस्नान. त्वचेला नेहमी स्निग्धता असावी लागते यासाठी अभ्यंग स्नानात म्हणून तेल लावायचे. ऊनपाणी हे मंगल व शरीराला सुखदायक आहे म्हणून ऊनपाण्याने स्नान सांगितले आहे.
5 / 6
उटण्यामुळे जास्तीची चरबी नाहीशी होते. त्वचेचा वर्ण व पोत सुधारतो. उटणे म्हणजे साफ करणाऱ्या, पोषण करणाऱ्या व सुगंधी वनौषधींचे वस्त्रगाळ चूर्ण.
6 / 6
आंघोळीच्या वेळेस साबणाऐवजी उटणं दुधात किंवा पाण्यात कालवून त्वचेला चोळून लावावे. साबणातील फेसामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल व आर्द्रताही निघून जाते, तर उटण्यामुळे ती राखली जाते.
टॅग्स :diwaliदिवाळीDeepotsav 2017दीपोत्सव 2017Healthआरोग्य