म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 9घरामध्ये तुळशीचे रोप लावल्याने सुख-समृद्धी येते. शास्त्रात तुळशीचे रोप अतिशय शुभ मानले गेले आहे. तुळशीचेही अनेक प्रकार आहेत. पैकी रामा आणि श्यामा तुळशी मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. त्याबरोबरच वन तुळशी ज्याला लिंबू तुळशी आणि पांढरी तुळशी असेही म्हणतात. बहुतेक घरांमध्ये रामा आणि श्यामा तुळशी दिसतात. 2 / 9ज्योतिष शास्त्रानुसार तुम्ही घरात कोणतीही तुळशी लावू शकता. तुळशीची लागवड करून तुम्ही राम किंवा श्यामा यांची पूजा करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुळशीचे दोन्ही प्रकार लावू शकता. पण, पूजेच्या दृष्टिकोनातून रामा तुळशीचे महत्त्व अधिक असल्याचे सांगितले जाते. आषाढीला विशेषत: रामा तुळशीची पूजा करा. 3 / 9श्यामा तुळशीचा रंग किंचित जांभळा आहे. त्याची पाने काळ्या रंगाची असतात. श्यामा तुळशीमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. त्यामुळे पूजेपेक्षा आयुर्वेदात त्याचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो. याउलट रामा तुळस ही हिरवीगार असते. ती देखील औषधी असते, पण तिचा वापर पूजेत जास्त केला जातो. 4 / 9तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. घराच्या उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावणे सर्वात शुभ असते असे मानले जाते. तुळशीचे रोप लावल्याने घरात सुख-समृद्धी वाढते. तुमच्या घरातले रोप उत्तर दिशेला नसेल तर आषाढीच्या मुहूर्तावर हा महत्त्वपूर्ण बदल करून घ्या. 5 / 9तुळशीची पाने सुकल्यावर फेकून देऊ नका, त्याऐवजी ती लाल रंगाच्या कापडात बांधून ठेवा आणि तिची छोटीशी पुरचुंडी बांधून आपल्या तिजोरीत किंवा आपल्या पाकिटात ठेवा. यात रामा तसेच श्यामा तुळशीची पाने चालू शकतात. हा उपाय केला असता लक्ष्मी कृपा प्राप्त होते असे ज्योतिष शास्त्रात म्हटले आहे. 6 / 9जर कोणाच्या लग्नात काही अडथळे येत असतील तर तुळशीमंजरी दुधात मिसळून शिवलिंगावर अर्पण करा. असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात असे मानले जाते. तसेच विवाह लवकर ठरतो. 7 / 9शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या पूजेदरम्यान तुळशीमंजीरी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात की हा उपाय केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारते तसेच आर्थिक अडचणी दूर करण्याचा मार्ग सापडतो.8 / 9व्यवसायात प्रगती आणि प्रगती साधायची असेल तर ११ तुळशीच्या पानांवर 'श्री' लिहून गुरुवारी भगवान विष्णूला अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल. व्यावसायिक प्रगती होईल. नोकरीचा मार्ग सुकर होईल. 9 / 9सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल!