शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

मानवतमध्ये रेल्वे सिग्नल यंत्रणेत बिघाडाने वाहतूक खोळंबली; वारंवारच्या बिघाडाने प्रवासी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 1:34 PM

सिग्लन यंत्रणेतील बिघाडाची तीन दिवसांतील दुसरी वेळ

ठळक मुद्देमराठवाडा एक्स्प्रेस पाऊणतास थांबलीरेल्वे फाटकावर वाहनांच्या रांगा

मानवत (जि. परभणी) : तालुक्यातील मानवत रोड रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने तब्बल पाऊणतास धर्माबाद- मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस स्थानकाबाहेरच थांबविण्यात आली. तीन दिवसांमध्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड होण्याची ही दुसरी घटना आहे. वारंवार सिग्नल यंत्रणेत बिघाड होत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मानवत शहरापासून ८ कि.मी. आणि पाथरी शहरापासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या मानवत रोड रेल्वे स्थानकाचा वापर दोन्ही तालुक्यातील प्रवाशांना होतो. दररोज हजारो प्रवासी या स्थानकावरुन प्रवास करतात. मात्र मागील तीन दिवसांपासून सिग्नल यंत्रणेत बिघाड होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. परभणीहून निघालेली धर्माबाद-मनमाड रेल्वे मानवत रोड रेल्वेस्थानकाजवळ आली. बिघाड झाल्याने स्थानकापासून ५०० मीटर अंतरावर सिग्नलच्या बाहेर ही गाडी थांबवावी लागली. सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्यासाठी ४५ मिनिटे लागला. त्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागला. अगोदरच एक तास उशिराने धावत असलेली मराठवाडा एक्सप्रेस मानवत रोड रेल्वे स्थानकावरून ४५ मिनिटे उशिराने पुढील प्रवासाला निघाली. तीन दिवसांपूर्वीही नांदेड-दौंड या  रेल्वेतील प्रवाशांनाही  बिघाडाचा सामना करावा लागला.

उड्डाण पुलाचे काम संथ गतीने : राष्ट्रीय महामार्गावर मानवत-परभणी दरम्यान बायपास मार्ग तयार केला जात आहे. या मार्गामुळे परभणीचे अंतर २ ते अडीच कि.मी.ने कमी होणार आहे. मात्र उड्डाण पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहनचालक मानवत रोडकडून प्रवास करतात. या मार्गावरील रेल्वे फाटक दिवसभरात ३५ ते ४० वेळा बंद राहते. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम गतीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. 

रेल्वे फाटकही एक तास बंदयंत्रणेत बिघाड झाल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील रेल्वे फाटक बिघाड दुरुस्त होईपर्यत बंद ठेवले जाते. त्यामुळे वाहनचालकांंना फाटकावर ताटकळत थांबावे लागते. येथील रेल्वे फाटकाचे कनेक्शन सिग्नल यंत्रणेशी असल्याने मानवत स्थानकावरून आलेली रेल्वे पुढील स्थानकाकडे निघाल्यास रेल्वे स्थानकापासून ५०० मीटर अंतराच्या पुढे गेल्यानंतर फाटक आपोआप उघडते. मात्र बिघाडाच्या काळात हे फाटक बंद राहत असल्याने त्याचा फटका रेल्वे प्रवाशांसह राष्ट्रीय माहामार्गावरील प्रवाशांनाही सहन करावा लागत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेparabhaniपरभणीpassengerप्रवासी