शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

वाहतूककोंडी ठरतेय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:18 AM

परभणी : शहरातील सर्वच प्रमुख मार्गावर सोमवारी दिवसभर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वारंवार ...

परभणी : शहरातील सर्वच प्रमुख मार्गावर सोमवारी दिवसभर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वारंवार निर्माण होत असलेली वाहतुकीची समस्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

मागील अनेक वर्षांपासून शहरात वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. मात्र त्यावर ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे ही समस्या अधिकच वाढत आहे. शहरातील विविध भागात दररोज वाहतूक ठप्प होत असल्याने नागरिक जाम वैतागले आहेत. गुजरी बाजार, स्टेशन रोड, नारायण चाळ परिसर, शिवाजी चौक, नानलपेठ या भागात नेहमीच वाहतुकीची समस्या निर्माण होते. सोमवारी शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहने दाखल झाली. त्यातच अनेक मार्गावर जड वाहनांना प्रवेश नसतानाही ही वाहने या मार्गावरून धावत असल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.

येथील नारायण चाळ भागात तर दिवसभरातून आठ ते दहा वेळा वाहतूक ठप्प झाली होती. अर्धा ते पाऊण तासापर्यंत वाहतूक कोंडी झाल्याने वाहनधारक हैराण झाले होते. या भागात दररोज वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. या परिसरात चारही बाजूंनी एकाच वेळी वाहने येत आहेत. त्यामुळे कोंडी होत आहे. विशेष म्हणजे, वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती केली असताना देखील वाहतूक कोंडी मात्र नित्याची झाली आहे.

अतिक्रमणांमुळे वाहतुकीवर परिणाम

शहरात मुख्य रस्त्यांच्या कडेने किरकोळ अतिक्रमणे वाढली आहेत. भाजी आणि फळ विक्रेत्यांचे हातगाडे, पानटपऱ्या, विविध साहित्याची विक्री करणारे स्टॉल्स, तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानातील साहित्यही अनेक वेळा रस्त्यावरच ठेवले जाते. याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. वाहनांसाठी रस्ता शिल्लक नसल्याने वारंवार वाहतूककोंडी होत आहे.