शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत १२६० वन्यजिवांनी गमावले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:17 IST

परभणी : जिंतूर तालुक्याच्या ५० कि.मी.च्या परिघात मागच्या सहा महिन्यांत तब्बल १ हजार २६० वन्यजिवांना प्राण गमवावे लागले. त्याच्या ...

परभणी : जिंतूर तालुक्याच्या ५० कि.मी.च्या परिघात मागच्या सहा महिन्यांत तब्बल १ हजार २६० वन्यजिवांना प्राण गमवावे लागले. त्याच्या नोंदी मात्र कुठेही नाहीत. जिंतुरातील वन्यजीव अभ्यासकांनी या नोंदी घेऊन रस्ते अपघातातील वन्यजिवांच्या मृत्यूचे गांभीर्य प्रशासनासमोर मांडले आहे. त्यामुळे पर्यावरणातील या महत्त्वाच्या घटकाच्या अपघाती मृत्यूकडे शासन- प्रशासन गांभीर्याने पाहणार आहे की नाही? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

वाढते शहरीकरण आणि त्यात वाढलेल्या दळण-वळणाच्या समस्यांमुळे रस्ते अपघात ही नवी समस्या पुढे येत आहे. या अपघातात मानवी मृत्यूच्या नोंदी प्रशासन घेत असले तरी प्राण्यांच्या मृत्यूबाबत फारसे गांभीर्य घेतले जात नाही. पर्यावरणाच्या संवर्धनात वन्यजिवांचाही तेवढाच वाटा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिंतूर तालुक्यातील पक्षिमित्र अनिल उरटवाड यांनी ऑक्टोबर २०२० ते मार्च २०२१ या काळातील वन्यजिवांच्या अपघाती मृत्यूच्या नोंदी घेतल्या. जिंतूर तालुक्यातील ५० कि.मी. परिसरातच त्यांनी या नोंदी घेतल्या, तर त्याचा आकडा सहा महिन्यांत एक हजारांपेक्षाही पुढे आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात ही संख्या किती असेल याचा अंदाज बांधता येईल. यावरून वन्यजिवांचे रस्ते अपघात हा गंभीर विषय पुढे येत आहे. वनविभागासह उपप्रादेशिक परिवहन विभागाने यात पुढाकार घेऊन खबरदारी घेण्याची गरज आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. मात्र त्यात वन्यजिवांच्या मृत्यूविषयी साधा उल्लेखही नसतो. त्यामुळे शासनाचे आता या विषयाचे गांभीर्य ओळखून पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

अधिवास हिरावल्याने समस्या गंभीर

पक्षी अभ्यासक अनिल उरटवाड यांनी सांगितले, परभणी जिल्ह्यातील जैवविविधता अनेक संकटांना सामोरी जात आहे. वन्यजिवांची शिकार, विषप्रयोग, त्यांच्या अधिवासावर झालेले अतिक्रमण, वाढती लोकसंख्या आणि प्रदूषण या कारणांमुळे वन्यजीवन धोक्यात आले आहे. शेती आणि खाणकामामुळे वन्यजिवांचे विविध प्रकारचे अधिवास नष्ट झाले. वन्यजिवांपैकी उदमांजर, रानमांजर, मांस भक्षक अन्न पाण्याच्या शोधात दररोज किमान २० ते २५ कि.मी.चा प्रवास करीत असतात. या दरम्यान ते मानवी वस्ती, द्रुतगती मार्गावर सहज येतात. प्राणी आणि पक्ष्यांचे नेहमीच स्थलांतर होते. एका पेक्षा अधिक अधिवासांचा ते वापर करतात. दरवर्षी लाखो पक्षी, प्राणी रस्त्यांवरील वाहनांच्या अपघातात जीव गमावतात. परभणी जिल्ह्यातही ही संख्या मोठी आहे. त्यामुळे या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

ऑक्टोबर २० ते मार्च २१ या काळातील अपघाती मृत्यू

पक्षी : ७२०

साप : २००

प्राणी : ३४०

एकूण १२६०