शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सोनपेठ तालुक्यातील सात गावांचा तुटला संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:13 IST

बुधवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. गुरुवारीदेखील दिवसभर जिल्ह्यात भिज पावसाने हजेरी लावली आहे. अधूनमधून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी ...

बुधवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. गुरुवारीदेखील दिवसभर जिल्ह्यात भिज पावसाने हजेरी लावली आहे. अधूनमधून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसत होत्या. या पावसामुळे शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान, सोनपेठ तालुक्यातील शेळगाव ते उकडगाव या रस्त्यावरील नाल्याचे पाणी पुलावरून वाहत असल्याने सात गावांचा संपर्क काही काळासाठी तुटला होता. गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पाणी ओसरल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली; मात्र तोपर्यंत उकडगाव, गंगापिंपरी, गोळेगाव, पिंपळगाव आदी गावांचा संपर्क तुटला होता. विशेष म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या सातही गावांमधील ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता; मात्र तरीही रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही.

जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस होत असल्याने बळीराजा सुखावला आहे. दरम्यान, बुधवारी रात्री झालेल्या पावसाची प्रशासनाने चुकीची नोंद घेतली. परभणी तालुक्यातील सिंगणापूर मंडळात अत्यल्प पाऊस झालेला असतानाही प्रशासनाच्या नोंदीत मात्र या मंडळामध्ये १२८.३ मिमी पाऊस दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.