शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:14 IST

परभणी : यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे दहावीच्या परीक्षा झाल्या नसल्या, तरी निकाल द्यावयाचा आहे. हा निकाल देताना शिक्षकांसमोर अडचणी येत ...

परभणी : यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे दहावीच्या परीक्षा झाल्या नसल्या, तरी निकाल द्यावयाचा आहे. हा निकाल देताना शिक्षकांसमोर अडचणी येत आहेत. निकाल वेळेत न दिल्यास शाळाच जबाबदार राहणार असल्याने शाळा अन्‌ शिक्षकांवर निकाल वेळेत दाखल करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे दहावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. मात्र या विद्यार्थ्यांचा निकाल देणे बंधनकारक आहे. निकाल देण्यासाठी ठराविक मूल्यमापन पद्धती निश्चित करून देण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना शिक्षकांचा मोठा वेळ जात आहे. विद्यार्थ्यांचा निकाल शिक्षण मंडळाकडे दाखल करण्यासाठी दिलेला अवधी संपत आला असून, अनेक शाळांनी अद्याप शिक्षण विभागाकडे निकाल दाखल केला नाही. त्यामुळे निकाल वेळेत जमा करण्यासाठी शाळाच जबाबदार राहणार असून, या प्रक्रियेला गती द्यावी लागणार आहे.

दहावी परीक्षेचा निकाल देताना नववीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांचे ५० टक्के गुण तसेच दहावीची उपस्थिती, गृहपाठ, विविध उपक्रमांचे मूल्यमापन करून गुणदान करावयाचे आहे.

हे गुणदान करताना सरासरी १०० च्या पटीत काढावयाची आहे. यात शिक्षकांचा मोठा वेळ जात आहे.

ही सर्व प्रक्रिया करताना शिक्षकांसमोर अडचणी निर्माण होत असून, निकाल देण्यासाठी विलंब लागत आहे.