शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
4
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
5
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
6
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
7
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
8
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
9
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
10
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
11
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
12
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
13
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
14
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
15
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
16
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
17
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
18
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
19
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
20
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...

परभणी जिल्ह्यात जायकवाडीचे पाणी नसल्याचा परिणाम :२५ हजार एकरवरील शेती पडली पडीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:34 PM

यावर्षी उन्हाळी हंगामात जायकवाडीचे पाणी कालव्यात सोडण्यात न आल्याने २५ हजार हेक्टरवरील शेती पडीक पडल्याचे भयावह चित्र दिसून येत आहे़ पाण्याअभावी केळीच्या बागा करपल्या असून, ऊस जळून जात आहे़ त्याच बरोबर उन्हाळी हंगामातील पिके तर घेताच आली नाहीत़ त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : यावर्षी उन्हाळी हंगामात जायकवाडीचे पाणी कालव्यात सोडण्यात न आल्याने २५ हजार हेक्टरवरील शेती पडीक पडल्याचे भयावह चित्र दिसून येत आहे़ पाण्याअभावी केळीच्या बागा करपल्या असून, ऊस जळून जात आहे़ त्याच बरोबर उन्हाळी हंगामातील पिके तर घेताच आली नाहीत़ त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे़पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात ढालेगाव आणि मुदगल येथे २००६ मध्ये उच्च पातळी बंधारे बांधण्यात आले आहेत़ तर दुसºया बाजुने जायकवाडी धरणाचा डावा कालवा तालुक्यातून गेला आहे़ दोन्ही बाजुंनी सिंचन सुविधा उपलब्ध आहेत़ चांगल्या पाऊसकाळात या भागात मोठे सिंचन होत असे़ त्यामुळे बारमाही बागायती पिकेही घेतली जात होती़ एकेकाळी हा भाग सुजलाम सुफलाम असल्याचे दिसून येत होते़ मागील काही वर्षांत निसर्गाचे चित्र पालटले गेले आणि पावसाळ्यात पाहुण्यासारखा पाऊस बरसू लागला़ त्यामुळे या तालुक्यात मागील चार वर्षापासून शेतकरी दुष्काळाशी संघर्ष करीत असल्याचे दिसून येत आहे़ २०१७-१८ या वर्षात तालुक्यामध्ये पाऊस कमी झाला़ परंतु, जायकवाडीचे धरण हे १०० टक्के भरले गेले़ परिणामी परभणी जिल्ह्यातील रबी हंगामासाठी या धरणातून ३ आणि उन्हाळी हंगामात बारमाही व उन्हाळी पिकांसाठी ३ असे ६ पाणी आवर्तन जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आले होते़ यावर्षी तर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे़ मुदगल व ढालेगाव हे दोन्ही बंधारे कोरडेठाक पडले आहेत तर जायकवाडीचे पाणीही यावर्षी मिळाले नाही़परिणामी सिंचनाचे सर्व पर्याय बंद झाले़ या भागातील सिंचन आणि पिण्याचे पाणी जायकवाडीच्या पाण्यावरच अवलंबून असल्याचे वास्तव यावर्षी पुढे आले आहे़डाव्या कालव्यावर भिस्तजायकवाडीचा मुख्य डावा कालवा पाथरी भागातील वरखेड येथून सुरू होतो़ पाथरी उपविभागीय कार्यालयांतर्गत पाथरी, मानवत आणि परभणी तालुक्यातील काही भाग येतो़ जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर जिल्ह्यातील ३६ हजार हेक्टर क्षेत्राची मदार आहे़ त्यामुळे यावर्षी पाऊसच झाला नसल्याने बंधाºयाबरोबरच जायकवाडीतूनही पाणी मिळाले नाही़ त्यामुळे या ३६ हजार हेक्टर क्षेत्राला दुष्काळाचा सामना करावा लागला़

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळWaterपाणी