शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

अहो आश्चर्य ! जोरदार पाऊस झाल्यानंतरही मापकानुसार 'पर्जन्यच' नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 11:35 AM

या प्रकारामुळे पर्जन्यमापकावर शंका उपस्थित केली जात आहे.

पाथरी : दोन गावांमध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतरही पर्जन्यमापकावर मात्र शून्य नोंद झाल्याने पर्जन्यमापकाविषयी आता शंका निर्माण झाल्या आहेत.

तालुक्यातील पावसाची नोंद घेण्यासाठी महसूल मंडळनिहाय पर्जन्यमापके बसविण्यात आली आहेत. पाथरी तालुक्यामध्ये तीन मंडळ असून तीन ठिकाणी पर्जन्यमापक बसविण्यात आली आहेत. पाथरी मंडळात १३ गावे असून पाथरी शहरातील तहसील कार्यालयात पर्जन्यमापक बसविले आहे. २० जून रोजी रात्री या मंडळातील रेणापूर आणि वाघाळा या दोन गावांच्या शिवारात जोरदार पाऊस झाला. २१ जून रोजी पाथरी येथील पर्जन्यमापकावर या पावसाची नोंद होणे अपेक्षित होते. मात्र या पर्जन्यमापकाने शून्य मि.मी. पावसाची नोंद दर्शविली आहे. या प्रकारामुळे पर्जन्यमापकावर शंका उपस्थित केली जात आहे.

दुष्काळ ठेवण्यासाठी पाऊस महत्त्वाचा घटकमहसूल प्रशासनाने घेतलेल्या पावसाच्या नोंदीवरून जिल्ह्यातील दुष्काळाची आणि नुकसानीची नोंद घेतली जाते. त्यामुळे पर्जन्यमापक हा महत्त्वपूर्ण घटक आहे. मात्र या पर्जन्यमापकद्वारे अचूक नोंदी होत नसतील तर त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.

या पावसाळी हंगामात पाथरी मंडळात दोन वेळा अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. मात्र प्रत्यक्षात या भागातील पिकांचे कुठलेही नुकसान झाले नाही. तर दुसरीकडे दोन गावात मोठा पाऊस झाला असताना पर्जन्यमापकाने नोंदच घेतली नाही. पर्जन्यमापकाच्या नोंदीतील विसंगतीमुळे शंका  व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणीagricultureशेती