शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

पुलावरील खड्ड्याने वाहनधारकांचे जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST

परभणी-जिंतूर या महामार्गाच्या नवनिर्माणासाठी केंद्र सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून मागील दोन वर्षांपासून या ...

परभणी-जिंतूर या महामार्गाच्या नवनिर्माणासाठी केंद्र सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून मागील दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. याच रस्त्यावर परभणी शहरालगत असलेल्या भारतनगर परिसरात जायकवाडी कालव्यावर मोठा पूल उभारण्यात आलेला आहे. या पुलाचे बांधकाम खूप वर्षांचे असल्याने सद्यस्थितीत हा पूल मोडकळीस आला आहे. या पुलाची नव्याने उभारणी करावी, अशी मागणी अनेक वेळा नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली. मात्र, या विभागाने सातत्याने नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. सद्यस्थितीत या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या पुलावरून वाहनधारकांना वाहने चालविताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यातच पुलावरील खड्ड्यांमध्ये मागील आठ दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे पुलावरील खड्डे वाहनधारकांच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे अनेक दुचाकीस्वारांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन या पुलाची नव्याने निर्मिती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.