शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :खडका बंधाऱ्यातून ४५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:15 IST

मराठवाड्यात पर्जन्यमान झालेले नसतानाही जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणातून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेल्या पाण्याने सोनपेठ तालुक्यातील खडका धरण भरले.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): मराठवाड्यात पर्जन्यमान झालेले नसतानाही जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणातून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेल्या पाण्याने सोनपेठ तालुक्यातील खडका धरण भरले. या धरणातून २४ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजता एक दरवाजा उघडून ४५०० क्युसेकच्या विसर्गाने गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. नदीपात्रात एक ते सव्वा मीटर पूर पातळी राहण्याची शक्यता असल्याने नदीकाठावर असलेल्या तालुक्यातील गावांना तहसील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.सोनपेठ तालुक्यात गोदावरी नदी पात्रात असलेल्या खडका धरणात जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. शनिवारी सकाळी ८ वाजता खडका धरणाच्या एका दरवाजातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. हे पाणी सकाळी धारासूर, मैराळ सावंगी, गौंडगाव, चिंच टाकळी मार्गे ११ वाजेच्या सुमारास महातपुरी परिसरातील गोदावरी नदीपात्रात धडकले. कोरड्याठाक पडलेल्या नदीच्या पात्रात पाण्याचा खळखळ आवाज सुरू झाला. गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाºयात रात्री ८ वाजेपर्यंत व गंगाखेड शहरात रात्री उशिराने पाण्याचे आगमन होणार आहे.गोदावरी नदीपात्रात एक ते सव्वा मिटरपर्यंत पाण्याचा प्रवाह दुथडी भरून वाहण्याचा अंदाज असल्याने पूर नियंत्रण कक्ष सक्रीय झाला आहे. तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी, मंडळ अधिकारी यांनी गोदावरी नदीकाठावर असलेल्या धारासूर, मैराळ सावंगी, गौंडगाव, चिंचटाकळी, खळी, महातपुरी, दुस्सलगाव, भांबरवाडी, मुळी, धारखेड, झोला, पिंपरी, मसला, नागठाणा आदी गावांसह गंगाखेड शहरातील तारूमोहल्ला, बरकत नगर, संत जनाबाई मंदिर परिसरात आदी भागातील रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.दरम्यान, गंगाखेड तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांसह जनावरांना दोन-दोन कि.मी. पाटपीट करावी लागत आहे. यातच जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. हे पाणी मुळी बंधाºयात साठवून ग्रामस्थांची तहान भागेल, अशी अपेक्षा होती; परंतु, पाटबंधारे विभागाने भविष्यातील पाणीप्रश्न विचारात न घेता आपल्या उदासिनतेचे प्रदर्शन दाखविले. त्यामुळे जायकवाडीतून गोदावरी नदीपात्रात दाखल झालेले पाणी सरळ पुढे निघून जाणार आहे.२ दलघमी पाणीसाठासोनपेठ तालुक्यातील खडका धरणातून गोदावरी नदीपात्रात शनिवारी सकाळी सोडण्यात आलेले पाणी १० तासानंतर मुळी निम्न पातळी बंधाºयात दाखल होईल. या बंधाºयात २.२५ दलघमी पाणी साठवण झाल्यानंतर दरवाजे नसल्याने आलेले पाणी पुढे वाहूून जाऊन रात्री उशिराने गंगाखेड शहरात दाखल होईल. खडका धरणात पाण्याची आवक सुरु राहिल्यास शुक्रवारी सोडण्यात आलेल्या पाण्यात २५ आॅगस्ट रोजी १ हजार क्युसेकने वाढ केल्या जाईल, अशी माहिती मासोळी प्रकल्पाचे शाखाधिकारी रामेश्वर उबाळे यांनी ‘लोकमतशी’ बोलताना दिली.‘मुळी बंधाºयात पाणी आडवा’सोनपेठ तालुक्यातील खडका धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडल्याने शनिवारी सकाळी ११ वाजेपासून गंगाखेड तालुक्यातील नदीपात्रात पाण्याची खळखळ सुरू झाली आहे. गंगाखेड तालुक्यातील मुळी निम्न पातळी बंधाºयाला दरवाजेच नसल्याने नदीपात्रात आलेले पाणी तसेच पुढे वाहून जाणार आहे. त्यामुळे तालुक्यातील आगामी पिण्याच्या पाण्याची उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेता मुळी बंधाºयात पाटबंधारे विभागाने तात्पुरता उपाययोजना आखावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणीRainपाऊस