शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात केवळ १६ टक्केच पीक कर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:13 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीयीकृत बँकांना १२१३ कोटी २२ लाख रुपयांचे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट राष्ट्रीयीकृत बँकांना ...

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीयीकृत बँकांना १२१३ कोटी २२ लाख रुपयांचे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट राष्ट्रीयीकृत बँकांना दिले होते. परंतु, १७ जूनपर्यंत केवळ १६ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. अद्यापही जवळपास ८५ टक्के पीक कर्ज वाटप बाकी आहे. जिल्ह्यातील व्यावसायिक बँकांना ७८१ कोटी ५८ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. परंतु, या बँकांनी आतापर्यंत केवळ ४ हजार ९३२ शेतकऱ्यांना ४७ कोटी ४५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यानंतर खासगी बँकांना १०१ कोटी १८ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले असताना या बँकांनी आतापर्यंत केवळ ३३१ शेतकऱ्यांना ३ कोटी ८३ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करत १७ जूनपर्यंत ३ टक्केच पीक कर्जाचे उद्दिष्ट गाठले आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र ग्रामीण बँकेने बँकेला १८७ कोटी ६३ लाख रुपयांचे पीक कर्जाचे उद्दिष्ट असताना खरीप हंगामाची पेरणी संपत आलेली असतानाही २ हजार १६० शेतकऱ्यांना आतापर्यंत १८ कोटी ९० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे, तर दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेच्या वतीने शाखेला १४२ कोटी ८३ लाख रुपये उद्दिष्ट या खरीप हंगामात देण्यात आले आहे. आतापर्यंत या बँकेने ३४ हजार ४१२ शेतकऱ्यांना १२४ कोटी ८७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करत सर्वाधिक ८७ टक्के पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. १७ जूनपर्यंत जिल्ह्यात १ हजार ८३५ शेतकऱ्यांना आतापर्यंत केवळ १९५ कोटी ५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना याहीवर्षी उसनवारी करूनच आपली पेरणी पूर्ण करावी लागत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन पीक कर्ज वाटपासाठी प्रत्येक बँकेत स्वतंत्र खिडकी योजना सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे,

बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँकेकडून कानाडोळा

यावर्षीच्या खरीप हंगामात व्यावसायिक बँकांमध्ये आत्तापर्यंत एसबीआय बँकेने ३ हजार ९४२ शेतकऱ्यांना ३६ कोटी ८५ लाख रुपयांचे वाटप केले आहे, तर दुसरीकडे बँक ऑफ इंडियाने केवळ ७ शेतकऱ्यांना ६ लाख रुपयांचे वाटप केले आहे. त्यामुळे व्यावसायिक बँकांमध्ये बँक ऑफ इंडियाकडून पीक कर्ज वाटपाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. खासगी बँकांमध्ये आतापर्यंत सर्वाधिक आयडीबीआय बँकेने १६५ शेतकऱ्यांना १ कोटी ५ लाख रुपयांचे वाटप केले आहे. एचडीएफसी बँकेने आतापर्यंत केवळ एका शेतकऱ्याला ७ लाख रुपयांचे वाटप केले आहे. त्यामुळे व्यावसायिक बँकेमध्ये बँक ऑफ इंडिया तर खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक पीक कर्ज वाटपाकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे.