शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑनलाइन’ने बिघडविले हस्ताक्षर अन्‌ लिहिण्याची गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:11 IST

कोरोनाच्या संसर्गामुळे मागील वर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यातील शाळा बंद झाल्या. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील अपवाद वगळता आतापर्यंत शाळा बंद ...

कोरोनाच्या संसर्गामुळे मागील वर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यातील शाळा बंद झाल्या. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील अपवाद वगळता आतापर्यंत शाळा बंद असून, ऑनलाइन शिक्षण मात्र जोरात सुरू आहे. मोबाइलवर आलेली लिंक उघडून अध्यापन करणाऱ्या या विद्यार्थ्यांमध्ये आता लिहिण्याची सवय कमी झाली आहे. त्यामुळे हस्ताक्षराकडेही दुर्लक्ष झाले असून, विद्यार्थी लिहिण्यापासून दूर जाण्याची भीती निर्माण झाली आहे. नियमित लिखाण, अध्ययन या बाबींमध्ये खंड पडल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षिणक नुकसान होत आहे. त्यामुळे आता पालकांनीच गुरुजनांची भूमिका निभावून विद्यार्थ्यांकडून कटाक्षाने लिखाण, हस्ताक्षर सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

शाळेमध्ये मराठी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांच्या मतानुसार भाषेच्या विकासाचा पायाभूत पैलूंपैकी र्त्त्वात्वाचा पैलू हा लेखन कौशल्य आहे. लेखन कौशल्य विकसित झाल्याशिवाय संभाषण कौशल्य विकसित होणार नाही. ऑनलाइनमुळे मुले शुद्धलेखन विसरून जात आहेत. मोबाइलवरील संभाषण हे जास्त काळ ऐकले जाऊ शकत नाही. त्यातच शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा परिपूर्ण संवाद होत नाही. याचाही परिणाम भाषा अभ्यास व इतर विषयाच्या अध्यापन गतीवर होत आहे. लेखन कौशल्य अत्यावश्यक असून, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

विद्यार्थ्यांनो हे करा !

शाळेत शिक्षण घेत असताना गुरुजींनी दिलेला अभ्यास लिहून घेणे तसेच गृहपाठ करण्याची सवय विद्यार्थ्यांना होती. ती कायम ठेवावी.

मराठी हस्ताक्षरासाठी दररोज किमान एक तास दोन रेघी वहीवर आणि इंग्रजी हस्ताक्षरासाठी चार रेघी वहीवर सराव करावा.

मराठी विषयाचे तज्ज्ञ म्हणतात....

लेखन कौशल्यातूनच संभाषण कौशल्य विकसित होत असते. लेखनातून विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढते. ऑनलाइनमुळे हा विकास खुंटतो की काय, अशी भीती आहे.

-सुभाष ढगे, शिक्षक

शैक्षणिक कार्यात लेखणाला महत्त्व आहे. मूल्यांकनासाठी लेखी परीक्षा हेच माध्यम आहे. त्यामुळे हस्ताक्षर चांगले नसेल व गती नसेल तर गुणांवर परिणाम होतो.

-सुभाष ढगे, शिक्षक

मोबाइलवरून येणाऱ्या गृहपाठाचा स्क्रिनशॉट काढण्याऐवजी तो संपूर्ण लिहून घेणे पालकांनी बंधनकारक करावे.