शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तीन कोटींचा निधी खर्च करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:23 IST

शासनाने ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी १५व्या वित्त आयोगाच्या निधीचा पहिला आणि दुसरा टप्पा जिल्हा परिषदेकडे वर्ग केला होता. हा निधी ...

शासनाने ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी १५व्या वित्त आयोगाच्या निधीचा पहिला आणि दुसरा टप्पा जिल्हा परिषदेकडे वर्ग केला होता. हा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश होते. मात्र, सप्टेंब,र २०२० उजाडेपर्यंत पंचायत विभागाने ग्रामपंचायतीच्या खात्यावर निधी वर्ग केला नव्हता. सरतेशेवटी १ सप्टेंबर रोजी तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या खात्यावर १ कोटी ४६ लाख ६३ हजार रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर, ऑक्टोबरमध्ये एवढ्याच रकमेचा ५० टक्के दुसरा हप्ता ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. याच दरम्यान, काळात राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून खासगी व्यक्ती प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. यामुळे विद्यमान सरपंचांनी हा निधी आपल्यालाच खर्च करता येईल, यासाठी प्रशासक म्हणून आपलं नाव पुढे केले होते. मात्र, या ४१ ग्रामपंचायतची मुदत संपल्याने २२ ऑक्टोबर रोजी शासकीय अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आल्याने विद्यमान सरपंचाचा हिरमोड झाला होता. मात्र, प्रशासक असलेल्या एकाही ग्रामपंचायतीत विकास कामासाठी निधी खर्च झाला नव्हता. आपल्या कार्यकाळात प्रशासकांनी केवळ ग्रामपंचायतीत हजेरी लावल्याचे चित्र दिसून आले. प्रशासकांनी निधी खर्च न केल्याने, हा निधी ग्रामपंचायत खात्यावर तसाच पडून राहिला. यानंतर, ग्रामपंचायत निवडणुका घोषित झाल्यानंतर या निधीवर डोळा ठेवून बहुतांश पुढाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढविली. यामध्ये अनेकांना यश मिळाले. सरपंचपदाच्या निवडी झाल्यानंतर आयत्या मिळालेल्या या १५व्या वित्त आयोगाचा निधी विकास कामावर खर्च करण्यासाठी सरपंच उत्साही असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

सह्यांचे नमुने घेणे सुरू

८ ते १२ फेब्रुवारीदरम्यान तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर, ग्रामपंचायतीचा कारभार नव्याने पाहण्यासाठी प्रशासनाकडून नवनिर्वाचित सरपंचाचे बँक खाते उघडण्यासाठी सह्याचे नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. बँक खाते, तसेच इतर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, नवनिर्वाचित सरपंचांना या १५ वित्त आयोगाचा निधी विकास कामासाठी खर्च करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.