शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांकडून कोवळी पिके फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST

ताडबोरगाव परिसरातील किन्होळा, आटोळा, सोमठाणा, देवलगावसह परिसरातील बहुतांश गावांमध्ये मृग नक्षत्रात झालेल्या पेरणीमुळे यंदा शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु, ...

ताडबोरगाव परिसरातील किन्होळा, आटोळा, सोमठाणा, देवलगावसह परिसरातील बहुतांश गावांमध्ये मृग नक्षत्रात झालेल्या पेरणीमुळे यंदा शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु, पिकांचे अंकुरण होऊन कोवळ्या पिकांनी डोकेवर काढताच या भागातील रोही व हरणांचे कळप पिकांचे शेंडे फस्त करत आहेत. त्यामुळे दुबार लागवडीच्या खर्चाबरोबरच नंतरही पिकांच्या उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. या भागात कुठेही माळरान, दाट झाडीची पडिक जमीन नसल्यामुळे या वन्य प्राण्यांचे कळप चारा पाण्याच्या शोधात सतत फिरून शेतीचे नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांची मोठी डोकेदुखी वाढली आहे. पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरीवर्गाला सकाळी भल्या पहाटेपासून रात्रीपर्यंत शेतातच थांबावे लागत आहे. सततच्या सहवासाने हे वन्य प्राणीदेखील निर्भीड झाले असून, कितीही हाकलले तरी फिरून पुन्हा शेतावर येतात. त्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. वन विभागाने याचा बंदोबस्त करावा, याबाबत अनेकदा अर्ज करूनही वन विभागाला याचे कुठलेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांचा खर्च वाढला

शेतीत मशागत, पेरणी, खते, बियाणे औषधे, काढणी, मळणी याबरोबरच आता पिकांच्या संरक्षणाचा खर्च वाढला आहे. शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेताला कुंपण करणे, जाळ्या लावणे, याबरोबरच रात्रीच्या वेळी पहारा देण्यासाठी राखणदार लावणे अनिवार्य झाल्याने शेतकऱ्यांवर हा अधिकचा आर्थिक भुर्दंड पडून त्यांच्या खर्चात वाढ झाली आहे.

"पहिले कापसाचे पीक फस्त केल्यानंतर पाच एकरवर दुबार लागवड करूनही पीक संरक्षणासाठी आता दिवस रात्र राखण करावी लागत आहे.

नितीन खरवडे, शेतकरी किन्होळा

वनविभाग नावालाच

वन्य प्राण्यांपासून पिकांची नासाडी झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची तरतूद असली तरी त्यासाठी वन विभागाकडे अर्ज केल्यानंतर सदर प्रकरणाची शहानिशा संबंधित वनपाल अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व कृषी अधिकारी यांची समिती करते. त्यात पंचनामा करून पुरावे तपासून नुकसान क्षेत्राची मोजणी करत नुकसान मूल्य ठरवले जाते. परंतु तक्रार ,पंचनामा या गोष्टीसाठी वन विभागाकडे खेटे घालून मदत मिळेलच याची खात्री नसल्याने भरपाई मागणे म्हणजे ''रोगापेक्षा इलाज भयंकर'' अशी स्थिती असल्याने शेतकरी तक्रार देण्याच्या भानगडीत पडत नसल्याचे दिसते.