शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वाढले शेतीचे सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:16 IST

पीक विम्याच्या प्रश्नावर प्रशासनाची चुप्पी परभणी : जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त ...

पीक विम्याच्या प्रश्नावर प्रशासनाची चुप्पी

परभणी : जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनी आणि कृषी विभागाकडे तक्रारीही नोंदविल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही. कृषी विभागही याबाबत फारसा पाठपुरावा करीत नसल्याने शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेपासून वंचित राहावे लागत आहे.

प्लास्टिकमुक्तीच्या ग्रामीण भागात प्रतिसाद

परभणी : जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात प्लास्टिकमुक्त गाव चळवळ राबविली जात आहे. स्वच्छता अभियानाबरोबरच प्लास्टिक मुक्त गावाचे जनजागरण केले जात असून, ठिकठिकाण प्लास्टिक कचरा संकलित केला जात आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणास धोका निर्माण होतो. तेव्हा न कुजणाऱ्या प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन केले जात आहे.

वाहनतळांच्या जागांवर अतिक्रमण

परभणी : शहरात वाहनतळासाठी निश्चित केलेल्या जागांवर अतिक्रमण झाले असून, वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने रस्त्याच्या कडेनेच वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. शहरातील वाहतुकीची समस्या मागील अनेक वर्षांपासून निर्माण झाली आहे. मनपाने वाहनतळाच्या जागेवर झालेले अतिक्रमण हटवावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी

परभणी : जिल्ह्यात सध्या रबीची पिके बहरात असून, या पिकांना पाणी देण्यासाठी कृषिपंपाला दिवसा वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, ग्रामीण भागात कृषिपंपाचा वीज पुरवठा दिवसभर खंडित ठेवून रात्रीच्या वेळी सुरू केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. महावितरण कंपनीने कृषिपंपाला दिवसा वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

चौक बनला धोकादायक

परभणी : येथील स्टेडियम परिसरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ चारही बाजूने येणाऱ्या रस्त्यावर चौकाची निर्मिती न केल्याने हा परिसर वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. चारही बाजूने एकाच वेळी वाहने या चौकात येतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने या ठिकाणी चौकाची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे.