शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

मानवत तालुक्यात जोरदार पाऊस, किन्होळा गावात बैलजोडी वाहून गेली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 6:49 PM

जवळपास महिनाभराच्या खंडानंतर बुधवारी (दि.१५) रात्री साडेबारा वाजता सुरु झालेल्या पावसाने आज सकाळी विश्रांती घेतली.

मानवत (परभणी ) : जवळपास महिनाभराच्या खंडानंतर बुधवारी (दि.१५) रात्री साडेबारा वाजता सुरु झालेल्या पावसाने आज सकाळी विश्रांती घेतली. या जोरदार पावसाने तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. तर आज सकाळी किन्होळी गावातून गेलेल्या कॅनॉलमध्ये एक बैलगाडी बैलासह वाहून गेली. यात दोन्ही बैलांचा मृत्यू झाला तर चालक बचावला आहे.  

तालुक्यातील केकर जवळा मंडळात ७९ मि. मी, मानवत मंडळात १६३ मि. मी, कोल्हा मंडळात ६३ मि. मी पाउस पडल्याची सरासरी  नोंद महसूल विभागाकडे झाली आहे. या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असुन खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. 

संततधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्याप्रमाणावर पाणी आले आहे. किन्होळी गावातून गेलेल्या कॅनॉलला पाणी आले आहे. याच गावातील शेतकरी सर्जेराव कदम यांची बैलगाडी बैलासह कॅनॉलमध्ये वाहून गेली. यात दोन्ही बैलाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजता घडली. तसेच नागरजवळा पावसामुळे बापुराव शंकरराव कसारे, बाबासाहेब रामभाउ होगे, रमेश कल्याणराव होगे यांच्या घराच्या भिंती पडुन नुकसान झाले. शहरातही पावसाचा परिणाम दिसुन आला. काल पावसाने बाजार पेठेत शुकशुकाट होता. आज दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने बाजारपेठेत  गर्दी होती. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती