शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

अकरा लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गहू, तांदूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:18 IST

कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून, या काळात आर्थिक सहाय्य राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमानुसार अंत्योदय अन्न योजना ...

कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून, या काळात आर्थिक सहाय्य राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमानुसार अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजनेचे ४२ हजार ४३ कार्डधारकांना ९ हजार ६२० क्विंटल गहू आणि ४ हजार ९२७ क्विंटल तांदूळ प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे प्राधान्य कुटुंब योजनेतील ९ लाख ७६ हजार २२५ लाभार्थ्यांसाठी प्रति व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ याप्रमाणे एकूण ३० हजार ७९१ क्विंटल गहू आणि १७ हजार ९७७ क्विंटल तांदूळ जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. हे धान्य लाभार्थ्यांना मोफत वितरित केले जाणार आहे.

सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी मे आणि जून या दोन महिन्यांत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या धान्याव्यतिरिक्त दोन्ही योजनेतील ११ लाख ७६ हजार ९१९ सदस्यांना ८१ हजार ३१७ क्विंटल गहू आणि ५० हजार ८८३ क्विंटल तांदूळ प्रति सदस्य प्रतिमाह पाच किलो याप्रमाणे मोफत वितरित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे स्थलांतरित लाभार्थ्यांनादेखील पोर्टेबिलिटी योजनेचा लाभ घेत अन्नधान्याचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

दुकानदारांचा अंगठा लावून धान्याचे वितरण

ई-पॉस मशीनला लाभार्थ्याचा अंगठा घेऊन धान्य वितरण केले जाते; मात्र प्रत्येक लाभार्थ्याचा अंगठा घेतल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ दुकानदारांचा अंगठा घेऊन धान्य वितरण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुगळीकर यांनी दिली.