शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरानंतर खाद्यतेल स्वस्त; आता खुशाल खा चमचमीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST

कोरोनाचा सामना करणाऱ्या नागरिकांना इंधन दरवाढीबरोबरच सर्वसामान्यांच्या बजेटला धक्का देत महागाईच्या आगीत तेल ओतणाऱ्या खाद्य तेलाचे दरही दिवसेंदिवस गगनाला ...

कोरोनाचा सामना करणाऱ्या नागरिकांना इंधन दरवाढीबरोबरच सर्वसामान्यांच्या बजेटला धक्का देत महागाईच्या आगीत तेल ओतणाऱ्या खाद्य तेलाचे दरही दिवसेंदिवस गगनाला भिडू लागले. सोयाबीन तेलाचे १५ किलोचे दर हे २ हजार ६४० रुपयांवर जावून पोहोचले होते; मात्र दोन दिवसांपूर्वी खाद्यतेलाच्या किमतीत जवळपास १५ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे हेच दर आता २ हजार ४०० रुपयांवर येऊन पोहोचले आहेत तर दुसरीकडे १८५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणारे शेंगदाणा तेल परभणीच्या बाजारपेठेत १७० रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे विक्री झाले. १४८ रुपये प्रतिकिलोने विकणारे पाम तेल १४० रुपये किलोवर आले आहे.

२२० रुपये प्रतिकिलोने विक्री होणारे करडईचे तेल २० रुपये प्रतिकिलो कमी झाले आहे. २ हजार ६८० रुपयांनी सूर्यफूल तेलाची विक्री होणारी कॅन २ हजार ५५० रुपयांवर येऊन पेाहोचली आहे. त्यामुळे आता वर्षभरानंतर खाद्यतेल स्वस्त होत आहे. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला असून, सर्वसामान्यांचे बजेटही सावरले आहे. पावसाळ्यात चमचमीत खाण्याचे दिवस आले असून, खाद्यतेलाच्या स्वस्ताईने त्यात पुन्हा भर पडली आहे.

काही वर्षांमध्ये करडईचे उत्पादन घेऊन बोरी येथील घाण्यातून तेल काढून आणत होतो. हे तेल वर्षभर पुरायचे; मात्र आता करडईच्या उत्पादनात दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून करडईचे उत्पादन घेणे बंद केले आहे. परिणामी, बाजारपेठेतून दर महिन्याला सोयाबीनचे तेल खरेदी करावे लागत आहे.

- लक्ष्मण वैद्य, शेतकरी.

परभणी तालुका व परिसरातील तेल काढण्याचे घाणे बंद झाले आहेत. तेलासाठी आवश्यक शेतीमाल उत्पादित करताना शेतकऱ्यांचा फायदा होण्याच्या दृष्टीने अद्याप कोणतेही बियाणे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने संशाेधित केले नाही. त्यामुळे तेलवर्गीय पिकांचे उत्पादन घेणे बंद केले आहे.

- नरसिंग ठेंबरे, शेतकरी

शेंगदाणा, सूर्यफूल उत्पादन घटले

तेल उत्पादकांच्या मते जिल्ह्यातील शेंगदाणा, सूर्यफुलाबरोबरच करडईचे उत्पादन गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात घटले आहे. कच्चा माल उपलब्ध होत नसल्याने जिल्हा व परिसरातील तेल उद्योगही बंद पडले आहेत. या उत्पादनांना प्रोत्साहन दिल्यास तेलाचे दर नियंत्रणात येऊ शकतात.

राज्य शासन व कृषी विभागाने तेल वर्गीय पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे; मात्र जिल्ह्यात तेलवर्गीय पिकांसाठी कोणतेही व्हिजन सध्या तरी कृषी विभागाकडे दिसून येत नाही.