शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कचेरी वाहनांची गर्दी हटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST

शहरात विरुद्ध बाजूने वाहतूक परभणी : शहरातील बाजारपेठ भागात विरुद्ध बाजूने वाहतूक केली जात असून, त्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण ...

शहरात विरुद्ध बाजूने वाहतूक

परभणी : शहरातील बाजारपेठ भागात विरुद्ध बाजूने वाहतूक केली जात असून, त्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहेत. नानलपेठ कॉर्नरपासून ते शिवाजी चौकाकडे येणारा रस्ता एकेरी वाहतुकीचा असताना या मार्गावर दुहेरी वाहतूक होत आहे. वाहतूक शाखेकडून मात्र नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई होत नाही. त्यामुळे वाहतूक समस्या वाढत आहेत.

ग्रामीण भागात विजेचा समस्या वाढल्या

परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागात विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. विशेषत: कृषिपंपांना दिली जाणारी वीज वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी अडचणीत आहेत. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असतानाही पिकांना देणे पाणी शक्य होत नाही. त्यामुळे महावितरणविरोधात रोष व्यक्त होत आहे.

नाट्यगृहाचे काम प्रगतिपथावर

परभणी : शहरातील जिल्हा स्टेडियमसमोरील बचत भवनच्या जागेत नवीन नाट्यगृह उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. तळमजला आणि त्यावरील दोन मजल्यांचे काम पूर्ण झाले असून, सध्या तिसऱ्या मजल्याच्या स्लॅबचे काम सुरू आहे. हे काम येत्या तीन-चार महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.

पीकविम्याचा प्रश्न रखडलेला

परभणी : मागील वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा विमा अजूनही कंपनीने शेतकऱ्यांना परत केला नाही. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला असून, प्रशासन इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करूनही शेतकऱ्यांना विमा परताव्यापासून वंचित रहावे लागत आहे. कृषी विभागाने विमा कंपनीकडे पाठपुरावा करून मदत मिळवून द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था

परभणी : शहरातील सुपरमार्केट ते मोठा मारुती मंदिर या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, कारेगाव रोड भागातील अनेक वसाहतींमधील नागरिकांसाठी हा मुख्य वर्दळीचा रस्ता आहे. मनपाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

ग्रामीण भागात कृत्रिम पाणीटंचाई

परभणी : पाणीपुरवठा योजनांच्या जलस्रोतांना मुबलक पाणी उपलब्ध असतानाही ग्रामस्थांना मात्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. महावितरण कंपनीने थकबाकीच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित केला असून, पाणीपुरवठा योजना ठप्प आहेत. त्यामुळे शेतशिवारातून पाणी आणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.