शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
2
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
3
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
4
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
6
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
7
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
8
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
9
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
10
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
11
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
12
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
13
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
14
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
15
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
16
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
17
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
18
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
19
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
20
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी

‘नोकरी’ची गॅरंटी नसल्याने ‘छोकरी’ची निवड लांबणीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:18 AM

लॉकडाऊन काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. नोकरीच नसल्याने विवाह लांबणीवर टाकण्याचे प्रकार जिल्ह्यात घडले. परिणामी नोंदणी विवाह कमी झाले ...

लॉकडाऊन काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. नोकरीच नसल्याने विवाह लांबणीवर टाकण्याचे प्रकार जिल्ह्यात घडले. परिणामी नोंदणी विवाह कमी झाले आहेत.

दरवर्षी जिल्ह्यात सरासरी ६५ विवाह नोंदणी पद्धतीने होतात. मात्र, कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे हे प्रमाण निम्म्याने घटले आहे. जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट महिन्यांनंतर दरवर्षीच नोंदणीत वाढ होत असते.

- के. आर. मोरे,

विवाह नोंदणी अधिकारी

लॉकडाऊनमध्ये एकही नोंदणी नाही

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च महिन्यापासून जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे सर्व व्यवहार बंद राहिले.

लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांत एकाही विवाहाची नोंद झाली नाही. त्यापूर्वीच्या महिन्यांत मात्र नोंदणी झालेली आहे.

विवाह टाकले लांबणीवर

लॉकडाऊन काळात काही युवकांना नोकरी गमवावी लागली. मोठ्या शहरातील कंपन्यांमध्ये नोकरी करणारे हे युवक गावाकडे परतले होते.

नोकरीच नाही तर विवाह करायचा कसा, असा प्रश्न या युवकांना सतावत होता. त्यामुळे कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर नवीन कंपनी जॉईन करून त्यानंतरच विवाहाचे पाहू, असा विचार करून अनेकांनी विवाह लांबणीवर टाकले. त्याचाही परिणाम या काळातील विवाह नोंदणीत घट होण्यावर झाला आहे.

आर्थिक अडचणींचाही विचार

कोरोना संसर्ग काळात युवकांना नोकरी गमवावी लागल्याने त्यांच्यासमोर आर्थिक अडचणीही उभ्या ठाकल्या. त्यामुळे या काळात विवाह केल्यास या समस्या आणखीच वाढतील. असाही विचार करून अनेकांनी आपले विवाह लांबणीवर टाकले.