शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

वाहनतळाचा जिल्हा कचेरीत बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:15 IST

जिल्ह्यात वाढला वाळूचा अवैध उपसा परभणी : जिल्ह्यात वाळू घाटांचे लिलाव झाले असले, तरी नदी पात्रातून अवैधरीत्या वाळूचा उपसा ...

जिल्ह्यात वाढला वाळूचा अवैध उपसा

परभणी : जिल्ह्यात वाळू घाटांचे लिलाव झाले असले, तरी नदी पात्रातून अवैधरीत्या वाळूचा उपसा केला जात आहे. महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन सातत्याने वाळू उपशाविरुद्ध कारवाई करीत असताना हा वाळू उपसा अद्यापही कमी झाला नाही. त्यामुळे खुल्या बाजारात वाळूचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तेव्हा जिल्ह्यातील वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे.

दुभाजक नसल्याने वाढले अपघात

परभणी : येथील वसमत रस्त्यावरील खानापूर फाट्याच्या समोर रस्त्यावर दुभाजक नसल्याने किरकोळ अपघात होत आहेत. या भागात सध्या नवीन वसाहती वाढल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकही वाढली आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते खानापूर फाट्यापर्यंतच दुभाजक टाकलेले आहे. हे दुभाजक पुढे दत्तधामपर्यंत वाढवावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.

पाणीविक्रीच्या व्यवसायाला सुरुवात

परभणी : जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागल असून, खासगी पाण्याचा व्यवसाय हळूहळू वाढू लागला आहे. नळ योजनेद्वारे नियमित आणि मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने, अनेक भागांत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत आहे. त्याचा फायदा उचलत खासगी व्यावसायिकांनी पाण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यातच अनेक भागांत नळ योजना पोहोचलेली नाही. त्यामुळे उन्हाळ्यात बोअरचे पाणी आटल्यानंतर खासगी पाणी व्यावसायिकांवरच नागरिकांची भिस्त राहत आहे.

रेल्वे स्थानकावर वाढली प्रवाशांची संख्या

परभणी : शहरातील रेल्वे स्थानकावर आता प्रवाशांची संख्या वाढली आहे. नांदेड-मनमाड या मार्गावर रेल्वे प्रशासनाने अनेक रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. सध्या आरक्षणासह रेल्वेचा प्रवास करावा लागत आहे. बससेवेच्या तुलनेत हा प्रवास सुरक्षित असल्याने प्रवाशांनी रेल्वेच्या प्रवासालाच महत्त्व दिले असून, रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या वाढली आहे.

कालव्यावरील पुलाची दुरवस्था

परभणी : शहरातील जिंतूर रस्त्यावरील जायकवाडी कालव्यावरील पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलावरील रस्ता जागोजागी उखडला आहे. त्यामुळे वाहनधारकांना अडखळत वाहने चालवावी लागत आहेत. मागील अनेक वर्षांपासूनची ही समस्या आहे. तेव्हा पुलावरील या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.