शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

पाणी सोडा, अन्यथा खुर्ची मिळणार नाही! परभणीत जायकवाडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे रणशिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 16:45 IST

परभणीत जायकवाडीच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; आंदोलकांनी अभियंत्यांची खुर्ची केली जप्त

परभणी : जायकवाडी कालव्यात तात्काळ पाणी सोडावे या मागणीसाठी सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने थेट पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक देत कार्यकारी अभियंत्यांची खुर्चीच जप्त केली. जोपर्यंत जायकवाडी कालव्यातून किमान १००० क्युसेकने पाणी सोडले जात नाही, तोपर्यंत खुर्ची परत मिळणार नाही, असा इशारा देण्यात आला.

परभणी जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव नाही, पीक विमा मिळाला नाही, आणि आता उरलेली पिकेही पाण्याअभावी वाळण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, याकडे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. नियमानुसार २००० क्युसेकने पाणी सोडणे अपेक्षित असताना केवळ ८०० क्युसेकनेच विसर्ग सुरू असल्याने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही. परिणामी, शेतकऱ्यांची पिके जळत असल्याचा आरोप यावेळी संघटनेच्या पदाधिकारी शेतकऱ्यांनी करत पाटबंधारे विभाग क्र. ०२ च्या कार्यालय गाठले. त्याठिकाणी कार्यकारी अभियंता प्रिया लांजेकर या अनुपस्थित असल्याचे समोर आले.

पाण्यासाठी त्यांच्या फोनवरून दोन-चार दिवसात पाणी सोडू अशी उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. याच संतापातून कार्यकर्त्यांनी थेट अधिकाऱ्यांची खुर्ची कार्यालयाबाहेर काढून जप्त केली. जोपर्यंत जायकवाडी कालव्यातून किमान १००० क्युसेकने पाणी सोडले जात नाही, तोपर्यंत खुर्ची परत मिळणार नाही, असा इशारा देण्यात आला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामप्रसाद गमे, प्रसाद गरुड, उमेश देशमुख यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers seize chair in Parbhani demanding Jayakwadi water release.

Web Summary : Farmers in Parbhani protested, seizing an executive engineer's chair, demanding immediate release of 1000 cusecs of water into the Jayakwadi canal. They cited crop damage due to insufficient water supply and official negligence despite prior requests.
टॅग्स :FarmerशेतकरीparabhaniपरभणीAgriculture Sectorशेती क्षेत्र