परभणी : जायकवाडी कालव्यात तात्काळ पाणी सोडावे या मागणीसाठी सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने थेट पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक देत कार्यकारी अभियंत्यांची खुर्चीच जप्त केली. जोपर्यंत जायकवाडी कालव्यातून किमान १००० क्युसेकने पाणी सोडले जात नाही, तोपर्यंत खुर्ची परत मिळणार नाही, असा इशारा देण्यात आला.
परभणी जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव नाही, पीक विमा मिळाला नाही, आणि आता उरलेली पिकेही पाण्याअभावी वाळण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, याकडे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. नियमानुसार २००० क्युसेकने पाणी सोडणे अपेक्षित असताना केवळ ८०० क्युसेकनेच विसर्ग सुरू असल्याने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही. परिणामी, शेतकऱ्यांची पिके जळत असल्याचा आरोप यावेळी संघटनेच्या पदाधिकारी शेतकऱ्यांनी करत पाटबंधारे विभाग क्र. ०२ च्या कार्यालय गाठले. त्याठिकाणी कार्यकारी अभियंता प्रिया लांजेकर या अनुपस्थित असल्याचे समोर आले.
पाण्यासाठी त्यांच्या फोनवरून दोन-चार दिवसात पाणी सोडू अशी उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. याच संतापातून कार्यकर्त्यांनी थेट अधिकाऱ्यांची खुर्ची कार्यालयाबाहेर काढून जप्त केली. जोपर्यंत जायकवाडी कालव्यातून किमान १००० क्युसेकने पाणी सोडले जात नाही, तोपर्यंत खुर्ची परत मिळणार नाही, असा इशारा देण्यात आला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामप्रसाद गमे, प्रसाद गरुड, उमेश देशमुख यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
Web Summary : Farmers in Parbhani protested, seizing an executive engineer's chair, demanding immediate release of 1000 cusecs of water into the Jayakwadi canal. They cited crop damage due to insufficient water supply and official negligence despite prior requests.
Web Summary : परभणी में किसानों ने विरोध प्रदर्शन करते हुए एक कार्यकारी अभियंता की कुर्सी छीन ली, और जायकवाड़ी नहर में तत्काल 1000 क्यूसेक पानी छोड़ने की मांग की। उन्होंने अपर्याप्त पानी की आपूर्ति और पहले के अनुरोधों के बावजूद आधिकारिक लापरवाही के कारण फसल क्षति का हवाला दिया।