शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
3
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
4
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
5
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
6
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
7
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
8
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
9
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
10
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
11
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
12
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
13
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
14
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
15
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
16
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
17
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
18
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
19
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
20
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...

गंभीर पूरपरिस्थितीसाठी गोदावरी सिंचन विकास महामंडळ जबाबदार;पूरग्रस्तांनी मांडल्या वेदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 15:44 IST

Flood in Marathwada : बेजबाबदार कार्यपद्धतीने जनतेस गंभीर पूरपरिस्थितीत लोटणार्‍या गोदावरी सिंचन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांविरुद्ध गुन्हा नोंद करावा

ठळक मुद्देसत्याग्रह आंदोलनातून पूरग्रस्तांनी मांडल्या वेदना

परभणी : जिल्ह्यासह मराठवाडा विभागामध्‍ये पूर परिस्थिती निर्माण करण्यास गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाचे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने १५ सप्टेंबर रोजी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. सप्टेंबर महिन्यात गोदावरी, दुधना, पूर्णा, मासोळी, करपरा या नद्यांसह ओढ्याला आलेल्या पुरामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ही पूरपरिस्थिती गंभीर होण्यासाठी गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाचे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला. 

राजन क्षीरसागर, माणिक कदम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्हाभरातील शेतकरी, पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बेजबाबदार कार्यपद्धतीने जनतेस गंभीर पूरपरिस्थितीत लोटणार्‍या गोदावरी सिंचन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांविरुद्ध गुन्हा नोंद करावा, पूरग्रस्त आणि अतिवृष्टीने बाधित जनतेस ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयाच्या तरतुदी लागू करून हेक्‍टरी ४० हजार रुपये अनुदान द्यावे, संपूर्ण खरीप पीक कर्ज माफ करावे, पीक विमा योजनेतून सर्व अतिवृष्टी बाधित तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांना १०० टक्के पीक नुकसान भरपाई जोखीम रक्कमेच्या प्रमाणात अदा करावी, ७२ तासात तक्रार करण्याची पिक विमा योजनेतील चुकीची तरतूद रद्द करावी, बाधित क्षेत्रातील पीक कापणी प्रयोग रद्द करावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा - मराठवाड्यात ४२ ठिकाणी ढगफुटी; २० लाख ३९ हजार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

या आंदोलनात राजन क्षीरसागर, माणिक कदम, शिवाजी कदम, ओमकार पवार, नवनाथ कोळी, प्रकाश गोरे, आसाराम बुधवंत, शेख अब्दुल, ज्ञानेश्वर काळे, चंद्रकांत जाधव, नरहरी काळे, गजानन देशमुख आदींसह बहुसंख्य पूरग्रस्त शेतकरी सहभागी झाले होते. बंधार्‍याचे दरवाजे १५ सप्टेंबर पूर्वी बंद करू नयेत, असा शासन निर्णय असताना गोदावरी नदीवरील बंधारे १५ सप्टेंबरपूर्वी शंभर टक्के पाण्याने भरण्यात आले. त्यानंतर धरणातून पाणी सोडण्यापूर्वी बंधाऱ्यातील पाणीसाठा, धरणांच्या दरवाजांची स्थिती यासंदर्भात पाटबंधारे प्रशासनाने समन्वय ठेवला नाही. त्यामुळे गोदावरी आणि उपनद्यांना पूर आला. कृत्रिम रित्या ही परिस्थिती निर्माण करण्यात आल्याचा आरोप राजन क्षीरसागर यांनी केला आहे.

हेही वाचा - येलदरी जलविद्युत केंद्राची विक्रमी कामगिरी; एकाच दिवसात पाच लाख ४६ हजार युनिट वीज निर्मिती

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनfloodपूरMarathwadaमराठवाडाparabhaniपरभणी