शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
6
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
7
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
8
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
9
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
10
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
11
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
12
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
13
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
14
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
15
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
16
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
17
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
18
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
19
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
20
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर

परभणी जिल्ह्यात खरिपाच्या ८७ टक्के पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:39 AM

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने चालू वर्षातील खरीप हंगामात ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून १६ जुलैपर्यंत ४ लाख ५५ हजार ८८० हेक्टर क्षेत्रावर (८७.३६ टक्के) पेरणी पूर्ण करण्यात असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. प्रारंभीच्या अल्प पावसावर पेरणी केलेल्या पिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने चालू वर्षातील खरीप हंगामात ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून १६ जुलैपर्यंत ४ लाख ५५ हजार ८८० हेक्टर क्षेत्रावर (८७.३६ टक्के) पेरणी पूर्ण करण्यात असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. प्रारंभीच्या अल्प पावसावर पेरणी केलेल्या पिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.२०१८-१९ या खरीप हंगामात कृषी विभागाने नियोजन केलेल्या साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु, आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर हे तीन्ही महिने कोरडेठाक गेले. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केली होती. त्या शेतकºयांचे पीक जागेवरच करपून गेले.उसणवारी व बँकांच्या दारामध्ये उभे राहून मिळालेल्या पैशांतून शेतकºयांनी बी-बियाणे व कीटकनाशकांची खरेदी केली होती; परंतु, कोणतेच पीक हाती न लागल्याने जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा आर्थिक कोंडीत सापडला.गतवर्षीच्या दुष्काळाला मागे सारुन शेतकºयांनी यावर्षीच्या खरीप हंगामातून पेरणी केलेल्या पिकातून भरपूर उत्पन्न मिळेल, या अपेक्षेने तयारी केली.मृग व आर्द्रा हे दोन्ही नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकºयांच्या चिंतेत आणखीच भर पडली; परंतु, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या सर्वदूर पावसावर शेतकºयांनी पेरणीस प्रारंभ केला. १६ जुलैपर्यंत ४ लाख ५५ हजार ८८० हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण केली आहे. म्हणजेच एकूण पेरणीच्या ८७.३६ टक्के पेरणी झाली आहे. मात्र पावसाने पुन्हा एकदा या हंगामात उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकºयांची पिके जागेवरच ऊन धरत आहेत.येत्या आठ दिवसांत जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला तरच शेतकºयांची पिके तरणार आहेत; अन्यथा शेतकºयांना याही वर्षी खरीप हंगामातील उत्पादनावर पाणी फेरावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.१ लाख ९२ हजार हेक्टरवर सोयाबिनचा पेरा४जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने खरीप हंगामामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, तूर भूईमुग, सूर्यफुल व कापूस ही पिके घेतली जातात. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या अहवालानुसार १६ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये २३ हजार ५९८ हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी झाली आहे.४उडदाची ६ हजार ४१७ हेक्टरवर तर तुरीची ४० हजार ९९१ हेक्टर क्षेत्रावर तर सर्वाधिक १ लाख ९२ हजार ६४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्याचबरोबर १ लाख ८६ हजार २१९ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली आहे.सोयाबीन : कापसावर किडीचा प्रादुर्भाव४जिल्ह्यात अल्प पावसावर प्रारंभी पेरणी केलेली पिके बºयापैकी आली आहेत. पावसाचे उघडीप दिल्याने कापूस व सोयाबीन पिकावर पैसा व करडे भुंगे या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. या किडी कोवळ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत.४पैसा ही कीड कपाशीचे सर्वाधिक नुकसान करते. त्यामुळे शेतात व बांधावरील पैसा कीड हाताने वेचून त्या साबणाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा खोल खड्डा करुन जमिनीमध्ये गाडून टाकाव्यात. शेत तृण विरहित ठेवावे. तसेच बांधावरील तृणाचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी केले आहे.४ तसेच करडे भुंगे ही कीड साधारणत: कमी महत्त्वाची असून ती नियमितपणे पिकांवर अत्यल्प प्रमाणात आढळून येते. परंतु, कधीकधी या किडीचा उपद्रव अधिक प्रमाणात दिसून येतो. ही कीड पानांना गोलाकार छिद्र पाडून कोवळी रोपे खाऊन टाकते. या किडीच्या व्यवस्थापनासाठी मोनोक्रोटोफॉस ३६ एसएल २५ मि.लिटर प्रति १० लिटर पाण्यात मिसळून साध्या पंपाने फवारणी करावी, असे आवाहन वनामकृविचे कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.पी.आर. झंवर व सहायक प्रा. डॉ. अनंत बडगुजर यांनी केले आहे....तर दुबार पेरणीचे संकट४पावसाळा सुरु होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे; परंतु, अद्यापही एकही दमदार पाऊस झाला नाही. परिणामी जमिनीत ओलावा टिकून नाही.४जिल्ह्यात १६ जुलैपर्यंत ४ लाख ५५ हजार ८८० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सध्या बहुतांश ठिकाणी पिकांनी ऊन धरले आहे. हीच परिस्थिती आणखी आठ दिवस राहिली.४ दमदार पाऊस झाला नाही तर शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. त्यातच पेरणीचा कालावधी संपलेला असल्याने दुबार पेरणी होते की नाही, असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊस