शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

विमा कंपनीच्या बनवेगिरीला कंटाळले ७२ हजार शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:18 AM

परभणी जिल्ह्यात दरवर्षी ७ लाख ५० हजार शेतकरी पीक विमा भरून आपली पिके संरक्षित करतात. मात्र, गेल्या दोन वर्षांत ...

परभणी जिल्ह्यात दरवर्षी ७ लाख ५० हजार शेतकरी पीक विमा भरून आपली पिके संरक्षित करतात. मात्र, गेल्या दोन वर्षांत पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांना आलेले कटू अनुभव पाहता शेतकऱ्यांचा पीक विमा काढण्याकडे कल कमी झाला असल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून दिसते. त्यातच जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठे नुकसान होत आहे. २०२०-२१ या खरीप हंगामात जिल्ह्यातील ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी ३२ कोटी ९० लाख १४ हजार ३२४ रुपयांच्या पीक विम्याचा हप्ता भरून ३ लाख ७६ हजार ८१ हेक्‍टरवरील पिके संरक्षित केली होती. मात्र रिलायन्स जनरल इन्शुरन्स विमा कंपनीने शेतकऱ्यांना मदत देताना दुजाभाव केल्याचे दिसून येत आहे. जवळपास संरक्षित केलेल्या सर्वच पिकांचे नुकसान झाले असतानाही या विमा कंपनीने केवळ बोटावर मोजण्याइतकेच शेतकऱ्यांना मदत देऊन ८० कोटी रुपयांचा पीक विमा वाटप केला. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊनही विमा कंपनीकडून मात्र नुकसानभरपाई देताना आखडता हात घेतल्याचे दिसून येत असल्याने दरवर्षी विमा भरणाऱ्या शेतकऱ्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. २०२१-२२ या खरीप हंगामातील ६ लाख २७ हजार ४१२ शेतकऱ्याने ३० कोटी ७० लाख ८१ हजार ३६१ रुपयांचा विमा हप्ता कंपनीकडे भरला आहे. ३ लाख ६१ हजार ७२८ हेक्‍टर क्षेत्रावरील पिके संरक्षित केले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ७२ हजार ५०० शेतकऱ्यांनी विमा भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत देऊनही पाठ फिरवली आहे. त्यामुळे पीकविम्याच्या नुकसानभरपाई मिळण्याच्या निकषात किंवा आनुषंगिक तांत्रिक बाबींमध्ये बदल करण्याची अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहेत.

क्रॉप इन्शुरन्स ॲप चालेना

जिल्ह्यात मागील आठ दिवसांत अतिवृष्टी सह मोठा पाऊस झाला. त्याचबरोबर दुधना, पूर्णा, गोदावरी, करपरा, लेंडी, फाल्गुनी आदी नद्यांना पूर आल्याने या पुराचे पाणी नदीकाठावरील शेतामध्ये घुसले. त्यामुळे कापूस, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे या नुकसानीचे ७२ तासांच्या आत तक्रार नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनी ने दिलेल्या क्रॉप इन्शुरन्स ॲपवर प्रयत्न केले. मात्र हे ॲप बंद असून विमा कंपनीने नेमलेल्या प्रतिनिधीचे मोबाइल नंबर ही कव्हर क्षेत्राच्या बाहेर असल्याने नुकसानग्रस्त शेतकरी पीकविमा कंपनीबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.