शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
5
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
6
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
7
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
8
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
9
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
10
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
11
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
12
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
13
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
14
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
15
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
16
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
17
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
18
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
19
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपनीच्या बनवेगिरीला कंटाळले ७२ हजार शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:18 IST

परभणी जिल्ह्यात दरवर्षी ७ लाख ५० हजार शेतकरी पीक विमा भरून आपली पिके संरक्षित करतात. मात्र, गेल्या दोन वर्षांत ...

परभणी जिल्ह्यात दरवर्षी ७ लाख ५० हजार शेतकरी पीक विमा भरून आपली पिके संरक्षित करतात. मात्र, गेल्या दोन वर्षांत पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांना आलेले कटू अनुभव पाहता शेतकऱ्यांचा पीक विमा काढण्याकडे कल कमी झाला असल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून दिसते. त्यातच जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठे नुकसान होत आहे. २०२०-२१ या खरीप हंगामात जिल्ह्यातील ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी ३२ कोटी ९० लाख १४ हजार ३२४ रुपयांच्या पीक विम्याचा हप्ता भरून ३ लाख ७६ हजार ८१ हेक्‍टरवरील पिके संरक्षित केली होती. मात्र रिलायन्स जनरल इन्शुरन्स विमा कंपनीने शेतकऱ्यांना मदत देताना दुजाभाव केल्याचे दिसून येत आहे. जवळपास संरक्षित केलेल्या सर्वच पिकांचे नुकसान झाले असतानाही या विमा कंपनीने केवळ बोटावर मोजण्याइतकेच शेतकऱ्यांना मदत देऊन ८० कोटी रुपयांचा पीक विमा वाटप केला. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊनही विमा कंपनीकडून मात्र नुकसानभरपाई देताना आखडता हात घेतल्याचे दिसून येत असल्याने दरवर्षी विमा भरणाऱ्या शेतकऱ्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. २०२१-२२ या खरीप हंगामातील ६ लाख २७ हजार ४१२ शेतकऱ्याने ३० कोटी ७० लाख ८१ हजार ३६१ रुपयांचा विमा हप्ता कंपनीकडे भरला आहे. ३ लाख ६१ हजार ७२८ हेक्‍टर क्षेत्रावरील पिके संरक्षित केले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ७२ हजार ५०० शेतकऱ्यांनी विमा भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत देऊनही पाठ फिरवली आहे. त्यामुळे पीकविम्याच्या नुकसानभरपाई मिळण्याच्या निकषात किंवा आनुषंगिक तांत्रिक बाबींमध्ये बदल करण्याची अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहेत.

क्रॉप इन्शुरन्स ॲप चालेना

जिल्ह्यात मागील आठ दिवसांत अतिवृष्टी सह मोठा पाऊस झाला. त्याचबरोबर दुधना, पूर्णा, गोदावरी, करपरा, लेंडी, फाल्गुनी आदी नद्यांना पूर आल्याने या पुराचे पाणी नदीकाठावरील शेतामध्ये घुसले. त्यामुळे कापूस, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे या नुकसानीचे ७२ तासांच्या आत तक्रार नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनी ने दिलेल्या क्रॉप इन्शुरन्स ॲपवर प्रयत्न केले. मात्र हे ॲप बंद असून विमा कंपनीने नेमलेल्या प्रतिनिधीचे मोबाइल नंबर ही कव्हर क्षेत्राच्या बाहेर असल्याने नुकसानग्रस्त शेतकरी पीकविमा कंपनीबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.